नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावाचे एक गरीब होतकरू शेतकरी बारकू जयराम पाटील यांचा 20 वर्षीय तरुण मुलगा संदीप हा सण.
-2017 या वर्षी आसाणे येथील त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी गेला असता विजेच्या शॉर्ट सर्किटने संदीपचा जागेवरच विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली.
त्यावेळी शेतकऱ्यास न्याय देण्यासाठी नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे ,उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील,गावातील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण पाटील यांच्या सततच्या महावितरण नंदुरबार येथे केलेल्या पाठपुराव्यास 2 ते 3 वर्षांने का असेना पण त्या शेतकऱ्यांस न्याय मिळवून दिला.त्याबद्दल सर्वत्र महावितरण टीमचे व सततचा पाठपुरावा करणारे शिवसेना टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आज महावितरण नंदुरबार ऑफिसमध्ये 4 लाखाचा धनादेश देताना महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे,कार्यकारी अभियंता संजय पाटील,साहाययक अभियंता प्रशांत गावित ,सुनील कऱ्हाड,महारु बागुल सोबत मयत संदीपचे वडील बारकू जयराम पाटील,माजी सरपंच युवराज पाटील,रामकृष्ण पाटील,शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील,रविंद्र पाटील,आदी उपस्थित होते .धनादेश घेत असताना संदिपच्या वडिलांच्या डोळे पाणावले होते.