नवापूर l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनांच्या औचित्यावर देशाला संबोधित करताना घोषणा केली आहे की २०२४ पर्यंत हर घर नळ,नळ से जल देऊन पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठीची भटकंती थांबवून देश टँकर मुक्त करण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल, नलसे जल मिळवण्यासाठी लोकसहभाग व लोकवर्गणी भरणे महत्वाचे आहे.असे प्रतिपादन कार्डचे सचिव पुष्कराज तायडे यांनी नानगीपाडा (ता.नवापूर) येथे आयोजित सभेत केले.
जल जीवन मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्ड अंमलबजावणी सहाय्य संस्था चे वरिष्ठ समाज शास्त्रज्ञा दर्शना वसावे,सरपंच यशवंत गावित, उपसरपंच सुनील गावित,ग्रामसेवक चंद्रशेखर सुर्वे, अनिल गावित, अंगणवाडी सेविका जयवंती वळवी तर बचत गटाच्या महिला व जलसुरक्षा रक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष महाराष्ट्र शासन मुंबईकडुन कार्डची आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासाठी निवड करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील ४० गांवात जल जीवन मिशन अंतर्गत सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (CARD) जालना ही अंमलबजावणी सहाय्य संस्था (ISA) म्हणून १५ जुलै २०२१ पासून कार्यरत आहे. जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (भाप्रसे), प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.वर्षा फडोळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर, गट विकास अधिकारी चंद्रकांत माळी, उपअभियंता विशाल कांबळे, कार्डचे अध्यक्ष प्रा सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा.डॉ.रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड, सहसचिव रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शना वसावे वरीष्ठ समाजशास्त्रज्ञ, इंजि.रूपेश खरात स्थापत्य अभियंता म्हणून कार्य करीत आहेत.
जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी कार्ड टीम ग्रामपंचायत व ग्रामसभेत ग्रामीण पाणी पुरवठा समिती स्थापन करून त्यांचे बँकेत खाते उघडने, गांवाच्या लोकसंख्याच्या प्रमाणात पिण्यासाठी व वापरासाठी लागणारे पाणी याचे अंदाजपत्रक मांडून, ग्रामीण लोकसभागीय मूल्याकन करून पाणीपुरवठा करण्यासाठीचे भौतिक व आर्थिक बजेट, गांव कृती आराखडा तयार करून त्यास ग्रामसभेत मंजुरी घेऊन लोकसहभागातून गावकरी कामे करणे, शेवटच्या कुटुंबापर्यंत पाणी पुरवठा पोहचवण्यासाठी कोपरा, वार्ड बैठका, गृहभेटीतुन भरावी लागणारी पाणीपट्टी, लोकवर्गणी आदी बाबतीत मार्गदर्शन व वेळोवेळी क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात येत आहे.