म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील काशिराम विश्राम माळी यांच्या शेतात ट्रांसफार्मवरील शोर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली.
याला फक्त महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळेच शॉर्ट सर्किट झाले असेल अशी शेतकरी बोलू लागले आहेत.यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी संबंधित विभागाने त्वरित पंचनामा करून त्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची भरपाई मिळावी अशी मागणी संबधित शेतकरी करू लागला आहे. शेतकऱ्याने व्याजाने पैसे काढून हाता तोंडाशी आलेला घास महावितरण कंपनीचा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या ऊस जळून खाक झाल्याची खंत व्यक्त होत आहे. संबंधित महावितरण कंपनीने त्या शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.