Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

team by team
July 19, 2021
in राजकीय
0
ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

नंदुरबार ! प्रतिनिधी
केंद्राच्या आडमुठेपणामुळे राज्यात ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले आहे. नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने मागितलेला इम्पिरियल डाटा केंद्र सरकारने सादर न केल्यास एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा कॉँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.यासह दि.९ ऑगस्ट रोजी राज्यात ओबीसी बचावो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
नंदुरबार येथे कॉँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, कॉँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सहकार्याध्यक्ष सुभाष पाटील, कॉँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष योगेश चौधरी, राजेश रघुवंशी, जि.प.सदस्य देवमन पवार, पंडीत मराठे आदी उपस्थित होते. यापुढे बोलतांना भानुदास माळी म्हणाले की, राज्यात ओबीसी, दलीत, भटके समाज हक्कासाठी आक्रमक झाला आहे. भाजपाने कॉँग्रेसच्या नेत्यांमध्ये विषारी विचार पेरुन लुबाडले. आता कॉँग्रेसने निर्माण केलेल्या संस्था विकण्याचा डाव भाजपाचा दिसून येत आहे. ओबीसींचे नोकर्‍यांमध्ये, राजकीय आरक्षण संपले आहे. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी आरक्षणासंदर्भातील इम्पिरियल डाटा न्यायालयात सादर केला नाही तर एक लाखाच्या संख्येने कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. यापुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेला कायदा हा शेतकरी विरोधी आहे. न्याय व्यवस्थेवर बंधन आल्याची शंका अनेकदा उपस्थित करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था भांडवलदारांना विकली गेली असल्याचा आरोप माळी यांनी केला. तसेच दि.९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी देखील आंदोलन छेडणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथून नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

Next Post

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Next Post
कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add