Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नोव्हेंबर अखेरपर्यंत लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला २ किलो गहु व ३ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार

Mahesh Patil by Mahesh Patil
July 18, 2021
in राज्य
0

नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला २ किलो गहु व ३ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
या कालावधीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल व त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या फक्त तांदळाचे मोफत वितरण करण्यात येईल. तांदळाचे वाटप करताना लाभार्थ्याने नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. मोफत वितरण केले असले तरी नागरीकांनी पावती घ्यावी.
अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेले नियमित ३५ किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य ३ किलो तांदूळाचे आणि २ किलो गव्हाचे मोफत वितरण करण्यात येईल. म्हणजे शिधापत्रिकेवर १ सदस्य असल्यास एकूण ५ किलो धान्य २ सदस्य असल्यास १० किलो धान्य याप्रमाणे मोफत वितरण होईल. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या ५ किलो धान्य प्रति सदस्य या प्रमाणात वितरण केल्यानंतर प्रति सदस्य ३ किलो तांदूळाचे आणि २ किलो गव्हाचे मोफत वितरण करण्यात येईल.
मोफत अतिरिक्त तांदळाचे वितरण ई-पॉस यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. मोफत तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम एफसीआयकडून प्राप्त करून घेण्यात येत आहे. हा तांदूळ प्राप्त झाल्यावर त्वरीत दुकानदारांमार्फत त्याचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यातील १०६१ रेशन दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेतील ५ लाख ३६ हजार १०९ व प्राधान्य कुटुंबातील ७ लाख ६ हजार ९३९ सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करण्यात येईल. दोन्ही योजनेअंतर्गत नियमित धान्य वितरण तांदूळ ३ रुपये प्रति किलो व गहू २ रुपये प्रति किलो याप्रमाणे होईल.
नियमाविरुद्ध वर्तन केल्यास दुकानदारांवर कारवाई
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दुकानदारांनी शासन नियमाप्रमाणे दर आकारावे व लाभार्थ्याकडून अतिरिक्त पैशाची मागणी करू नये. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत वितरीत होणार्‍या तांदूळासाठी पैसे आकारू नये व प्रमाणही कमी करू नये. गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवक यापैकी एका सदस्यास बोलावून त्याच्यासमोर वाटप करावे. दुकानदारांनी नियमांचा भंग केल्यास महाराष्ट्र अनुचित वस्तू (विनिमय व वितरण) आदेश १९७८, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा यशस्वी करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Next Post

रोटरी क्लब ऑफ नंदुरबार चा पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post
रोटरी क्लब ऑफ नंदुरबार चा पदग्रहण समारंभ उत्साहात

रोटरी क्लब ऑफ नंदुरबार चा पदग्रहण समारंभ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

September 24, 2023
पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

September 24, 2023
औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

September 24, 2023
सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

September 24, 2023
राम रहीम उत्सव समिती तर्फे गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत सहभागी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उद्या सत्कार

विविध रस्त्यांचे कामे त्वरित सुरू करा, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मागणी

September 24, 2023
नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

September 24, 2023

Total Views

  • 3,588,284 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group