नंदुरबार l प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील उमरफाटा येथील. दशरथ मावची या व्यक्तींचा दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ निम्स हॉस्पिटल नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना तात्काळ २ बॅग रक्तगट A+ ची गरज आहे.शहरातील ब्लॅड बॅंकेत संपर्क साधला असता रक्ताचा तुटवडा आहे असे सांगितले.नातेवाईकांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून गृपवर मॅसेज देण्यात आला होता. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी मेसेजची तात्काळ दखल घेत प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वास देसाई, धुळजी गावित, शरद मावची यांना संपर्क साधून तात्काळ जनकल्याण सेवा संस्था देसाईपुरा येथे जाऊन रक्तदान करण्यात आले. जनकल्याण ब्लड सेंटर रक्त संक्रमण अधिकारी अजय पवार यांच्या रक्तदात्यांचा हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत उपस्थित होते. तात्काळ दोन बॅग दवाखान्यात घेऊन पेशंट दशरथ मावची यांना दिल्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले आहे.या सामाजिक कार्याविषयी आनंद व्यक्त केला आहे.प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत करत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ महादान जपून सामाजिक बांधिलकीचा कर्तव्यभावनेने रक्तदान केले.रक्तदान केल्याने मला काही पुण्य मिळेल माझा काय फायदा हा निस्वार्थी विचार लोकांच्या मनात डोकावतो आणि हे रक्तदान करण्यापासून वंचित राहतात.आज घडीला रक्ताची आवश्यकता खूप आहे पण रक्तदाते जास्त नसल्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतः पुढे येउन रक्तदानासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही मत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी आवाहन केले आहे.










