Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

team by team
December 2, 2021
in क्राईम
0
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

अक्कलकुवा l प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात संबंधित प्राधिकारी यांना अवमान नोटीस बजावण्याचे महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील याचिकाकर्ते मांगीलाल पुखराज जैन, यांनी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, नंदुरबार, तसेच उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, अक्कलकुवा, यांना विद्युत बिल परतफेड करण्यासंदर्भात विनंती अर्ज केले होते. तहसीलदार अक्कलकुवा, यांनी दि. ७ डिसेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये संबंधित शेतकरी यांनी विद्युत बिल भरून दिलेले असून सदर चे कनेक्शन प्रकल्पबाधितांच्या नावे केलेले आहे तरी आपणास अदा केलेली रक्कम संबंधिताच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करण्याचे संबंधित अधिकारी यांना कळविले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार, यांनी सुद्धा दि. २८ डिसेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये संबंधित अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे निर्देशीत केले होते.याचिकाकर्ते यांनी सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी संबंधित प्राधिकारीचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तरी देखील संबंधित प्राधिकारी यांनी कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नव्हता. म्हणून याचिकाकर्ते यांनी सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत रिट याचिका क्रमांक ५७२५/२०२१ दाखल केली होती. थोडक्यात माहिती अशी की, शासनाने सरदार सरोवर प्रकल्प अंतर्गत बाधितांना शेत जमीन वाटप करणे कामी प्रकल्प बाधितांच्या पसंतीनुसार याचिकाकर्ते यांच्या मालकीची शेतजमीन खरेदी केलेली होती. वीज बिलाची रक्कम खरेदी प्रक्रिया करताना थकित होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार, यांच्या कार्यालयाने सदरची विद्युत बिल सुद्धा भरून दिले होते. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एम. लड्डा) यांनी दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशान्वये संबंधित प्राधिकारी यांना विद्युत बिल परतफेड प्रकरणात दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. सदर आदेशाचे पालन न केल्यामुळे याचिकाकर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक ६१६/२०२१ दाखल केली असता, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या.आर. एम. लड्डा) यांनी दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांना नोटीस बजावण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक :जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Next Post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा

Next Post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add