सातपुड्यातील खर्डी बुद्रुक पासून चार किलोमीटरचा डोंगर पार करत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड.सीमा वळवी यांनी शनिवारी केलवापाणी, पालहाबार, कुयलिडाबर या गावांना भेट देवून गावकर्यांचा व्यथा जाणून घेतल्या.त्यानंतर त्यांनी रस्त्याचा प्रमुख प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.






सातपुड्यातील कुयरीडाबर, पालाहाबार व केवलापणी ही गावांना ऍड. सीमा वळवी यांनी शनिवारी भेट दिली होती. सदर गावांना खर्डी बु.पासून रस्ता नसल्यामुळे पायपीट करत डोंगर चडून जावे लागते. त्यामुळे ऍड.वळवी यांना देखील तब्बल साडे तीन ते चार किलोमीटर डोंगर पार करत जावे लागले. पालाबार येथे गेल्या नंतर गावकर्यांनी त्यांचे स्वागत केले.ऍड.वळवी यांनी गावकर्यांशी प्रत्यक्ष त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर रस्त्याच्या प्रमुख प्रश्न सोडवण्याची मागणी गावकर्यांनी केली. रस्ते अभावी सर्वच पायाभूत सुविधांसाठी आम्हाला अक्षरशः झगडावे लागत असल्याचे गावकर्यांनी सांगितले रत्याअभावी पाणी , शिक्षण,वीज आरोग्य आदी सुविधानाही सातत्याने तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा गावकर्यांनी मांडली. त्यावेळी ऍड.वळवी यांनी रस्त्याच्या प्रमुख प्रश्न बाबत पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्याशी चर्चा करून ठोस मार्ग काढण्याचे आश्वासन गावकर्यांना दिले. त्यानंतर ऍड. सीमा वळवी यांनी गावातील विहीर पाहिली ज्या ठिकाणी नदी म्हणून पाण्याचा झिरपा निघतो, तेथूनच लोक पाणी पितात शिवाय जनावरांच्या पाणी पिण्याचा हाळ बघितलात्याचबरोबर गुजरात मध्ये कामासाठी गावातील जे लोक स्थलांतरीत झाले आहेत त्यांचा सर्वे करून यादी मला लवकर द्या अशी सूचना ही त्यांनी अंगणवाडी सेविकेला दिली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, संजय गांधी समतीच्या सदस्य निशा वळवी, रोहिदास पाडवी, राजकुमार पाडवी, भिकलाल वळवी, भगवान पाडवी, नवल पाडवी, कोचर्या पाडवी, संतोष गावित, शंकर पाडवी, शांताराम वळवी, खिमजी पाडवी, पाचा पाडवी, हूनाजी पाडवी, आदी यावेळी उपस्थित होते यावेळी या तिन्ही गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.