नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पुन्हा एकदा नंदुरबार आगारातील कामगारांनी आज गुरुवार दि. 4 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ऐन दिवाळी सणात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.
यापूर्वीदेखील 27 ऑक्टोंबर रोजी महागाई भत्ता, कामगार आयोग आणि एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण या मागणीकरिता राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. परंतु एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना फक्त 16 टक्के महागाई देऊन त्यांची बोळवण केली . कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन पार्श्वभूमीवर धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यादेखील नंदुरबारला आल्या कामगारांत तर्फे काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले .यावेळीनंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार उपस्थित होते. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी दिवाळी सणात प्रवाशांची गैरसोय होऊ नये. म्हणून कामावर हजर होण्याची विनंती करण्यात आली. मात्र विनंती झुगारून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले. या संपाला पाठिंबा म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी भेट दिली.