नवापूर l प्रतिनिधी-
शहरातील भगवान महावीर पतसंस्थेचे ठेवीदारांनी आज संस्थेचे चेअरमन विरचंद अग्रवाल यांच्या घरा च्या ओट्यावर महिलांनी ठिय्या मांडल्याने काही काळ वातवरण चांगलेच तापले होते. महिला ओट्यावर आक्रोश करतांना भगवान महावीर पतसंस्थेचे ठेवीदार अनेक दिवसा पासून आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी फिरत आहे. काही दिवसा पूर्वी संस्थेच्या चेअरमन आणि सभासदांनी बैठक घेऊन दि 28 तारखेला सभासदांना ठेवी पैकी काही रक्कम परत देणार असल्याचे जाहीर केल्याने आज दुपारी 12 वाजे पासून पतसंस्थेच्या कार्यालयात ठेवीदारांनी गर्दी केल्याचे दिसून आली होते.

पतसंस्थेचे ठेवीदारांनी भरलेल्या रकमेच्या 25%रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याने मॅनेजर संजय पाटील आणि चेअरमन विरचंद अग्रवाल कार्यालयात चेक घेऊन ठेविदाराची यादी तयार करत होते.अचानक चेअरमन विरचंद अग्रवाल फ्रेश होण्यासाठी घरी गेल्याचे सांगून परत न आल्याने संतप्त ठेवीदारांनी आपला मोर्चा सरळ चेअरमन विरचंद अग्रवाल यांचा राहत्या घरी वळवला सर्व महिला पुरुष गांधी पुतळ्या मागील बाजूस शितल सोसायटी येथे विरचंद अग्रवाल यांच्या घरा समोरच ठिय्या मांडला होता.
त्यात काही रोज मासेमारी करून आपले जीवन उदरनिर्वाह करणारे आपले पैसे मिळणार या अपेक्षेने आले होते परन्तु आज त्याच्या रोज ही मिळणार नसल्याचे बघून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला होता.
आलेल्या ठेवीदारांन मध्ये अनेक मोल मंजुरी करणारे असून काही किरकोळ भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवत असलेले तर काही महिला नि पोटाला चिमटा देत आपली बचत ह्या पतसंस्थेत जमा केली होती ऐन दिवाळी समोर असतांना आपल्या मेहनतीचा पैश्या साठी होत असलेली फरफट पैसे मिळणार की नाही अशा अवस्थेत चेअरमन च्या उंबरठ्यावर ठिय्या मांडलेल्या महिलांचे अश्रू अनावर झाले ठेवीदारांचे आणि उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.
हळूहळू ठेवीदारांची गर्दी वाढल्याचे बघून पोलिस घटना स्थळी दाखल झाले ठेवीदारांनी आपला आक्रोश सहायक पोलिस निरीक्षक अशोक मोकळ समोर कथन ठेविदार करत होते. जो पर्यंत चेअरमन अग्रवाल स्वत येऊन पैसे देणार नाही तो पर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे स्पष्ट पोलिसांना सांगत ठिय्या मांडला होतो.








