अक्कलकुवा l प्रतिनिधी-
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही कामाचा मनात न्यूनगंड न बाळगता ते काम प्रामाणिकपणाने करुन त्यात समाधान मानावे तीच खऱ्या आयुष्याची व यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
सोरापाडा येथील श्री. महाकाली माता मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामिण जीवन्नोती अभियान (उमेद) यांच्या वतीने तालुक्यातील होराफळी, मोरंबा, खापर, अक्कलकुवा, सिंगपूर या 5 जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांच्या कार्यकर्ती महिलांचा भव्य महिला मेळावा संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षस्थाना वरुन आमदार पाडवी बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम वळवी, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, जिल्हा व्यवस्थापक सचिन बोरसे, सरपंच वसंत वसावे, ललित जाट, आनंद वसावे, सुनिता पाडवी, सौ. संध्या पाटील, निता माळी, छाया वळवी, सरला वळवी, मथुरा पाडवी, दुर्गा पाडवी, रावेंद्रसिंह चंदेल, नवरतन टाक, दिनेश खरात, अश्विन तडवी, रविंद्र चौधरी, रामसिंग वसावे, घिजु वसावे, ईश्वर तडवी आदीं उपस्थित होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक उमेदच्या तालुका समन्वयक मिनाक्षी वळवी यांनी केले त्यात त्यांनी तालुक्यातील उमेद अभियानाच्या प्रगतीची माहिती दिली. तर यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते तालुक्यातील चार प्रभाग संघातील 112 बचत गटांना 67 लाख 40 हजार रुपयांचा निधी चेक द्वारे प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,
कोणत्याही व्यवसायाची सुरुवात छोट्या पासुन करा, ते व्यापक होण्याच्या दृष्टीने आवश्यक परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. काम करत असतांना मोठी स्वप्ने ही बघा मात्र ती पुर्ण करण्यासाठी कठीण परिश्रमाची त्याला जोड द्या. तरंच मनात धारलेलं स्वप्न पुर्ण होण्यास बळ मिळेल. याप्रसंगी नवरतन टाक, ललित जाट, सुमन वळवी, ज्योती पाडवी, संगिता तडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक
मिनाक्षी वळवी, प्रभाग समन्वयक मगन पाडवी, तुषार वळवी, योगेश जाधव रायसिंगपूर, राकेश वसावे आदींनी परिश्रम घेतले.