Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

Mahesh Patil by Mahesh Patil
May 20, 2025
in राजकीय
0
लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर येथील तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. मात्र, या लोकशाही दिनाचा उद्देशच हरवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा आरोप तक्रारदार मंगेश येवले यांनी केला आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नवापूर तहसील कार्यालयात तालुका लोकशाही दिन आयोजित केला जातो. या दिवशी दाखल झालेल्या तक्रारींवर अध्यक्षांसमोरच तोडगा काढणे अपेक्षित असते. मात्र, कालच्या लोकशाही दिनात तक्रारदारांना वेगळाच अनुभव आला. महिन्याभरापूर्वी दाखल केलेल्या तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले. या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी अध्यक्षांनी तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न केले आणि पुढील वेळेत उत्तर देण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप येवले यांनी केला.

 

या प्रकारामुळे तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे वाटले, असे मंगेश येवले यांनी सांगितले. आजच्या लोकशाही दिनात वैद्यमापन शास्त्र, वजन मापे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

 

 

या लोकशाही दिनाला तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, RFO श्रीमती स्नेहल अवसरमल यांच्यासह विविध विभागांचे कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते. मात्र, तक्रारदारांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची भावना दिसून आली.
प्रशासनाचा लोकशाही दिन नेमका कोणासाठी आहे, असा प्रश्न आता तक्रारदारांमधून उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार कृषी सहायकांचा एल्गार,एक दिवशीय धरणे आंदोलनातुन प्रशासनाचे वेधले लक्ष

Next Post

नंदुरबार शहरात तीन लाखाचे बनावट एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे जप्त

Next Post
नंदुरबार शहरात तीन लाखाचे बनावट एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे जप्त

नंदुरबार शहरात तीन लाखाचे बनावट एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group