नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आदिवासी युवक-युवतींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी आज धडगाव येथे कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
या संवादादरम्यान शाळा सोडलेल्या आणि शिक्षणात अडथळे आलेल्या युवकांना पुन्हा शिक्षणाकडे वळवण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी, पोलीस भरतीसारख्या स्पर्धा परीक्षा, आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रम यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरणं सांगत स्वतःवर विश्वास ठेवून जीवनात पुढे जाण्याचं आवाहन केलं. “शिक्षण हेच खरं शस्त्र आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता,” असं ते यावेळी म्हणाले.
या उपक्रमामुळे अनेक शिक्षण सोडलेल्या युवकांनी पुन्हा एकदा शिक्षणाची दिशा घेण्याचा निर्धार केला असून, स्थानिक नागरिकांनी पोलीस विभागाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.