Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग मंजूर, नवीन खासदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये :डॉ. हिना गावित

team by team
September 4, 2024
in राजकीय
0
मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग मंजूर, नवीन खासदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये :डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनमाड इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करून आपल्याला गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. त्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या रेल्वे मार्गासाठी मी केलेला पाठपुराव्याला वेळोवेळी प्रतिसाद देणारे केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांचे तसेच केंद्रातील अन्य मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त करते. तसेच मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग मंजूर, नवीन खासदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असे आवाहन डॉ. हिना गावित यांनी केला.

नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, 2014 मध्ये मी प्रथमच खासदार बनले तेव्हापासून नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे जे जे प्रश्न असतील त्यांना दिल्ली दरबारात चालना देण्यासाठी, केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहिले आणि त्यामुळे माझ्या खासदारकीच्या दोन्ही कार्यकाळात व्यापार शेती उद्योग याला चालना देणारे निर्णय करून घेण्यात मला यश मिळाले. उल्लेखनीय विकास कामं त्यामुळे मी करू शकली.

 

उधना ते भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागावे, या मार्गावरील रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधा मिळाव्या, नंदुरबार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जावे हे निर्णय मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनामुळे आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे होऊ शकले आदिवासी भागाला याचा मोठा लाभ झाला आता मोदी सरकारच्या त्याच गतिमान कार्यपद्धतीचा आणखी एक मोठा लाभ आपल्याला झाला आहे.

 

मनमाडपासून मध्यप्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकृतपणे घोषणा करतांना सांगितले आहे की, या प्रकल्पाला पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली असून हा रेल्वे मार्ग प्रकल्प २०२८-२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत ३० नवी रेल्वे स्थानके मनमाड ते इंदूरदरम्यान रेल्वेमार्गावर उभारण्यात येतील. १,००० गावांना आणि ३० लाख लोकसंख्येला दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल असे डॉ.हिना गावित यांनी सांगितले.

 

*खानदेश ला होईल हा लाभ*

सर्वात महत्त्वाचं असं की, शिरपूर, लौकी आणि सांगवी हे तीन रेल्वे स्थानक या अंतर्गत निर्माण होतील. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक आणि दळणवळण गतिमान बनेल. आपल्या खानदेशातून इंदूर पर्यंत जाणारा मार्ग जलद होईल. धुळे ते इंदूर आणि धुळे ते मनमाड हा नवा रेल्वे मार्ग जोडला गेल्यामुळे दिल्ली इंदोर मुंबई सर्वत्र चा प्रवास खानदेशवासीयांना सोपा होईल. या नव्या रेल्वे मार्गामुळे खानदेशातील व्यापार उदीम वाढीस लागून अन्नधान्याची वाहतूक शेती उत्पन्नाचे वाहतूक याचबरोबर रोजगारासाठी प्रवास करणारे यांना हा रेल्वे मार्ग निश्चितच लाभदायक होईल.

 

*मालवाहतूक होणार सुलभ*

नव्या रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने, कंटेनर, खते, लोहखनिज, सिमेंट, पेट्रोलियम, तेल आणि वंगण यांची वाहतूक करणे अधिक • सुलभ होणार आहे. सुमारे २६ एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल.

तसेच मुंबईपासून इंदूरपर्यतच्या प्रवासातील २०० किमी अंतर कमी होणार आहे.या प्रकल्पाद्वारे १०२ लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील महत्त्वाच्या भागांतील दळणवळणाचे प्रमाण वाढेल. शिवाय महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे जोडले जाऊन त्या भागातील दळणवळण वाढेल.

 

 

या व्यतिरिक्त चे लाभ असे:

* मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळणाचे थेट साधन उपलब्ध होईल.

* मनमाड-इंदूरमधील नवीन रेल्वेत मार्गामुळे पर्यटनवाढीलाही मदत.

* श्री महाकालेश्वर ज्योतिलिंग रातील पर्यटनस्थळांना फायदा होईल.
* पीथमपूर ऑटो क्लस्टर हे या रेल्वेमार्गाद्वारे मुंबईजवळील जेएनपीए बंदर व अन्य राज्यांतील बंदराशी जोडले जाईल. पीथमपूर ऑटो क्लस्टरमध्ये ९० मोठे कारखाने व ६०० लहान व मध्यम श्रेणीतील उद्योग आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पोषण माहच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले उद्घाटन

Next Post

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा

Next Post
संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add