नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस. ए.मिनिस्ट्रिज ट्रस्ट संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदान जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांनी प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून प्रभातफेरीस सुरुवात करण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सी.पी बोरसे, प्रा.छाया बच्छाव, प्रा.सुनीता शिंदे, प्रा.दीपक शिंपी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते,जिथे प्रत्येक प्रौढ नागरिकाला आपले मत वापरण्याची मुभा आहे,
सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते तसेच सरकार स्थापन करण्यासाठी एक – एक मत अमूल्य असते,एक-एक मताने सरकार बनते आणि बिघडते तसेच नंदुरबार शहर तसेच परिसरातून शंभर टक्के मतदान व्हावे याकरीता शासनाद्वारे दिनांक चार ते सहा एप्रिल दरम्यान मतदान जनजागृतीसाठी हे उपक्रम राबवण्यात येत आहे दिनांक चार एप्रिल रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यामध्ये माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील बाराशे विद्यार्थीचा सहभाग घेतला,विद्यार्थ्यांद्वारे विविध घोषणा व माहिती च्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचे संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यात आले.
दिनांक पाच एप्रिल रोजी महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन केले असून “मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील महत्त्व”, “माझे मत, माझा अधिकार” या विषयावर विद्यार्थ्यांद्वारे निबंधाच्या माध्यमातून संदेश देण्यात येणार आहेत व दिनांक सहा एप्रिल रोजी विद्यार्थी आपल्या मित्र परिवारास तसेच नातेवाईकांना पत्रांच्या माध्यमातून संदेश पोहोचवून जनजागृती चे कार्य करणार आहे. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्माचारी परिश्रम घेत आहे.








