नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यासाठी महाराष्ट्रभर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे समाजाला एकत्रित करीत त्यापार्श्वभूमीवर नंदुरबार उमर्दे येथे दि.10 डिसेंबर रोजी गुलाब महारू मराठे हे दुसर्यांदा अन्नत्याग आंदोलन बसले. त्यानिमित्त काल राजमाता जिजाऊ यांच्या वडीलांच्या 16 व्या वंशाचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराज येथील राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव हे उपस्थित होते. उमर्दे येथे होणार्या साखळी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आले आहेत.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यासाठी महाराष्ट्रभर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे समाजाला एकत्रित करीत त्यापार्श्वभूमीवर नंदुरबार उमर्दे येथे दि.10 डिसेंबर रोजी गुलाब महारू मराठे हे दुसर्यांदा अन्नत्याग आंदोलन बसले. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सिंदखेडराज येथील राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्या 16 व्या पिढीतील वंशज राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव हे देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावोगावी जनजागृती करीत आहेत.
त्यांनी उमर्दे येथे आंदोलन स्थळी भेट दिली.सिंदखेडराज येथील राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्या 16 व्या पिढीतील वंशज राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव हे देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावोगावी जनजागृती करीत आहेत. नंदुरबार शिवातील वाघोदा येथे मराठा समाजाची सभा घेण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, आरक्षणाअभावी मराठा समाज आर्थिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागे पडलेला आहे.
शाहू महाराज यांच्या काळात आरक्षण मिळाले होते. परंतु दुर्देवाने मराठा समाजाला डावलले गेले. आता मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. तसेच 70 टक्के मराठा समाज हा कुणबीमध्ये गणला जातो. त्यामुळे उर्वरीत समाजाला आरक्षण देवून मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही महात्मा गांधी यांच्या अहिसेंच्या मार्गाने चालणारी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणासाठी झटावे लागत आहे. आरक्षणासाठी प्रत्येकाने लढा द्यावा, असेही आवाहन त्यांनी सकल मराठा समाजाला केले आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त
जन्मस्थळापासून समाध्दीस्थळी अभिवादन रथयात्रा
यावेळी मराठा समाज बांधवांना राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव यांनी आवाहन केले आहे की, राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील समध्दीस्थळी सालाबादाप्रमाणे साजरी करण्यात येते, परंतु समाजातील केवळ 60 ते 70 व्यक्तीच या कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यामुळे यावर्षापासून सिंदेखडराज येथील त्यांच्या जन्मास्थळी असलेल्या राजवाडी विहीरीतील पाणी घेऊन अभिवादन रथयात्रा मोठ्या संख्येने दि.15 जून ते 17 जून 2024 ला पाचाड येथे त्यांच्या समाध्दीस्थळी अभिवादन रथयात्रा काढण्यात येणार आहे.
त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील समाज बांधवांनी पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा येथील निवृत्त कमिशनर जे.बी.पाटील, धुळ्याचे निंबाजी मराठे, नितीन जगताप, उपोषणकर्ते गुलाब मराठे, नवनीत शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जितेंद्र खांडवे, शिक्षक अनिल वायकर, विक्की मराठे, अण्णा पवार, हरीष हराळ, किरण दाभाडे, दिनेशचंद्र मराठे, हिरालाल मराठे यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील उमर्दे, कोळदा, रजाळे, नंदुरबार, तळोदा शहर व तालुक्यातील तळवे येथील मराठा समाजातील युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण दाभाडे यांनी केले तर आभार सकल मराठा समाजाचे नितीन जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाघोदा येथील विक्की मराठे यांच्या कुटूंबियांनी परिश्रम घेतले.