नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे आयोजित श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरीच्या वतीने खानदेश विभागीय कृषी मेळाव्याच्या आज शेवटच्या दिवशी पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान व स्वयंरोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते .पहिल्या सत्रात पर्यावरण व माहिती तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्राचे उद्घाटन नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित जळगावचे जीवशास्त्र विभागाचे अधिव्याख्याता विक्रम पाटील ,नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विक्रमसिंग वळवी, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे ,दीपक चित्ते, चंद्रशेखर बडगुजर, किरण माळी ,आदी उपस्थित होते.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी पर्यावरणाच्या समतोल राखणे तसेच पर्यावरण वाचवणे आज काळाची गरज बनली आहे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वृक्षाची संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी जेणेकरून पर्यावरणाचा समतोल टिकून राहील असे सांगितले. तसेच आयोजित सायबर क्राईम या चर्चासत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी उपस्थित तंत्रज्ञान तसेच सायबर क्राईम वर मार्गदर्शन केले. दिवसातील आयोजित दुसऱ्या सत्रात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गावित, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त विजय रिसे, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी भावेश सोनवणे ,प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, मुकेश पाटील एस ए मिशन ट्रस्टचे चेअरमन राजेश वळवी, ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे सुरजीत वसावे, कासारे गावाचे सरपंच सुवर्णा देसले, माजी सरपंच विशाल देसले, दीपक पाटील, विवेक पाटील, गुलाब महाराज ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, एन डी चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी उपस्थित युवक युवतींना स्वयंरोजगार संदर्भात माहिती दिली. यावेळी स्वयंरोजगार मेळाव्या साठी महाराष्ट्रातील सात कंपन्यांनी सहभाग घेतला यात गोविंदा सर्विसेस ,महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग ,स्वयंरोजगार जिल्हा कौशल्य रोजगार, उद्योग संचालनालय अशा विविध कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या रोजगार मिळाव्यात जवळपास 500 च्या वर युवक युवतीने आपले नाव नोंदणी केली.








