तळोदा l प्रतिनिधी
शिक्षकांनी शाळेमध्ये अध्यापनाचे काम करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्यापन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव यांनी तळोदा तालुक्यातील मोरवड येथे झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये केले.
तळोदा तालुक्यातील तळवे जिल्हा परिषद केंद्र शाळेची शिक्षण परिषद तळोदा तालुक्यातील मोरवड येथे बुधवारी उत्साहात पार पडली. सुरुवातीला शिक्षणाच्या आराध्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या शिक्षण परिषदेला प्रमुख म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव हे होते. तर मार्गदर्शक म्हणून तळवे केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक बच्छाव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद पाडवी, मोरवड शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पवार उपस्थित होते. वसंत जाधव यांनी शिक्षकांना पुढे मार्गदर्शन करतांना म्हटले की, विद्यार्थ्यांना नवनवीन कसे काय देता येईल याची माहिती शिक्षण परिषद मध्ये मिळत असते.
शिक्षण परिषदेमुळे चांगल वातावरण निर्माण होऊन शिक्षकांमध्ये नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. शिक्षका जवळ नुसते ज्ञान असून ते चालणार नाही तर ते ज्ञान कसे व केव्हा वापरावे याचे देखील कौशल्य असले पाहिजे. जगात असे देखील व्यक्ती होऊन गेले की त्यांच्या जवळ ज्ञान नव्हते परंतु त्यांनी त्या गोष्टींचा सराव केला म्हणून ते आज मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. म्हणून के ए पी व 3ए या दोन मॅनेजमेंट तंत्रांचा वापर आपण करावा. असे ते म्हणाले. यावेळी केंद्रप्रमुख अशोक बच्छाव यांनी शासनाच्या आलेले परिपत्रक व सूचनांचे मार्गदर्शन केले.
तसेच शाळेमधील शिक्षकांच्या असलेल्या समस्या त्यांचे निराकरण केले. व शिक्षण परिषदेमध्ये घेण्यात आलेले विषयांचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये शिक्षण परिषद मागोवा, एफ एल एन उपक्रम, राज्यस्तरीय उपक्रम, दिक्षा ॲप, गणित विषय अ.नि पाठ प्रशासकीय सूचना, आदी विषय घेण्यात आले होते. व शेवटी शिक्षण परिषदेची सर्वाशिक्षकानी लिंक भरली. यावेळी तळवे केंद्राचे मुख्याध्यापक कैलास सोनवणे, दसवड शाळेचे मुख्याध्यापक उमेशकुमार पाडवी यांसह केंद्रातील सर्व शाळेचे
मुख्याध्याक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. आभार गोकुळ बांगर यांनी मानले.