नंदूरबार l प्रतिनिधी
16 सप्टेंबर हा ओझोन दिवस आहे ,त्यानिमित्ताने श्रॉफ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना ओझोन दिवसाची माहिती देण्यात आली.
ओझोन दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पर मार्गदर्शनात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा शहा यांनी ओझोनचा थर वाचवण्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून काय प्रयत्न केले पाहिजेत याची माहिती दिली.त्या म्हणाल्या की पृथ्वी वाचली तर जीवसृष्टी वाचेल आणि अन्नसाखळी टिकून राहील.
शाळेच्या शिक्षिका खगोल अभ्यासक सौ.चेतना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सूर्यापासून येणारे अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवले जाऊन अनेक प्रकारचे हानी टाळता येते,ओझोन चा थर कमी झाल्यामुळे कर्करोग व त्वचारोग होऊ शकतो .
वनस्पतींवर परिणाम होतो. खारफुटीच्या जंगलांवर परिणाम होतो. कीटकांच्या संख्येवर परिणाम होतो.
प्राणी व पक्षी यांच्यावरही परिणाम होतो. जलीय जीवांवर प्रचंड परिणाम होतो.जागतिक तापमानात वाढ होते.
हरितगृह परिणामाला चालना मिळते. त्यामुळे बर्फ वितळतो. समुद्राच्या पातळीत वाढ होते.
पावसावर आधारित शेती व्यवस्थेत बदल करावे लागतात. असे अनेक बदल ओझोन चा थर कमी झाल्यामुळे होतो.
कार्यक्रम प्रसंगी उप मुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया व जगदीश पाटील सर तसेच किशोर रौंदळ, नरेंद्र सूर्यवंशी, महेश पाटील, विवेक राजपूत हे शिक्षक उपस्थित होते.