Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन विविध कामांचे प्रस्ताव सादर करावेत- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
March 12, 2023
in राजकीय
0
संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन विविध कामांचे प्रस्ताव सादर करावेत- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून विविध योजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

 

ते आज नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता निलिमा मंडपे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासह रनाळा, मांडळ, खोंडामळी मंडळातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यासाठी संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई निवारण्याच्या कामासह विहीर अधिग्रहण, हातपंप, विहीर खोलीकरण, नदी,नाले, तलावाचे गाळ काढणे, नवीन हातपंप बसविणे, हातपंप दुरुस्ती तसेच रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या पाणंद रस्ते, घरकुल तसेच विविध योजनांची कामांच्या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने त्वरीत सादर करावा.

 

 

 

अशा प्राप्त प्रस्तावाला यंत्रणेने त्वरीत मंजूरी द्यावी. ज्या गावांना पाणीटंचाई जाणवणार आहे अशा गावांनी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी विद्युत विभागाने सुरळीत विद्युत पुरवठा करावा. लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन पाणी टंचाईसाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करून निर्णय घ्यावा.

 

 

 

पाणी पुरवठा योजनांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्या जलस्त्रोतात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. त्यानंतरच तेथून पाणीपुरवठा करावा. पर्यावरणांचा समतोल साधण्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा,गाव तसेच गावाच्या पडीक जमिनीवर मोठया प्रमाणात वृक्षारोपण करावे. रोहयोतंर्गत विविध योजनांची सांगड घालून विविध योजना राबविण्यात येत आहे त्याचा आराखडा तयार करावा.

 

 

 

कुठलाही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनाने सर्वासाठी घरे योजना राबविण्यात येत असून ज्या कुटूंबाचे ‘ड’ यादीत नाव नाही अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार असल्याने यासाठी नागरिकांनी अर्ज सादर करावेत. ग्रामसेवकांनी गाव, वाड्या, पाडे, अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राना जोडणाऱ्या कच्चे व नवीन रस्त्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. जेणे करुन त्यांना त्वरीत मंजूरी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

हवामान विभागातर्फे अलर्ट जारी :नंदूरबारजिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

Next Post

राष्ट्रवादीच्या जिल्हा सचिवपदी नितीन जगताप तर नंदुरबार शहर अध्यक्षपदी मोहन माळी यांची नियुक्ती

Next Post
राष्ट्रवादीच्या जिल्हा सचिवपदी नितीन जगताप तर नंदुरबार शहर अध्यक्षपदी  मोहन  माळी यांची नियुक्ती

राष्ट्रवादीच्या जिल्हा सचिवपदी नितीन जगताप तर नंदुरबार शहर अध्यक्षपदी मोहन माळी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add