नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाने मोफत धान्य देवून रेशनिंगचे दूकाने पूर्णता बंद करण्याच्या घाट केंद्र सरकारने घातलेला आहे.त्यामुळे कंटाळून निम्मे परवाना धारक राजीनामे देतील आणि इतर परवानाधारक कारणे दाखवून दुकाने बंद करतील अशी मोदी सरकारची योजना असल्याचा आरोप करीत नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार ६४ रेशन दुकानदारांनी दि.७ ते ९ फेब्रुवारी पर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेतलेला आहे.
याबाबत सोमवारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.त्यात म्हटले,नंदूरबार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना महासंघाच्या वतीने दि.७ ते ९ फेब्रुवारी या तीन दिवशी ऑल इंडिया फेअर शॉप डिलर्स फेडरेशन, नवी दिल्ली सलग्नीत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघचा वतीने दूकाने पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रसिद्धी पत्रकावर संजय चौधरी, प्रमोद बोडखे, नाना ठाकरे, जे बी शर्मा, शुभम रघुवंशी, ए एम अग्रवाल, प्रताप चौधरी, सदाशिव राजपूत,सुनील वैद्य, सु.भा वैद्य, प्रकाश चौधरी,अक्षय चौधरी, चंद्रकांत सोनार, अरविंद कुवर, उद्धव पिंपळे, महेंद्र चव्हाण, धारासिंग पावरा, लक्ष्मीबाई समुद्रे, सतीश अग्रवाल, देविदास आल्हाटकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.रेशनिंग दुकानदार दोन टप्प्यात आंदोलन करणार आहेत. पहिला टप्पा हा असुन दि.७ ते ९ फेब्रुवारी या दिवशी दूकाने बंद ठेवणार आहेत तर पुढील महीन्यात २२ मार्चला दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एकजूट दाखवणे गरजेचे
केंद्र सरकारने मोफत धान्य वितरणाच्या निर्णय घेऊन स्वस्त धान्य दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याच्या घाट घातलेला रेशनिंग चे दुकाने बंद झाल्यास दुकानदारांवर उपासमारीची वेळ येईल व त्यांचे कुटुंब देशोधडीला त्यामुळे सर्व दुकानदारांनी एकजूट दाखवावी. नागरिकांनी सहकार्य करावे.
नेमीचंद जैन,
जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना








