Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 8, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार l प्रतिनिधी
 हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असून दुपारी 3 वाजता  हतनूर धरणाचे 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात  76 हजार 993 क्युसेक विसर्ग  सोडण्यात  आला आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सुलवाडे प्रकल्पाचे 12  दरवाजे 3 मीटर उघडल्याने तापी नदीपात्रात 91 हजार 665 क्युसेक्स विसर्ग होत आहे. पुढील 72 तासात हतनूर आणि सुलवाडे प्रकल्पातून तापी नदीपात्रात  मोठा विसर्ग  सोडण्याची शक्यता आहे. तसेच बॅरेजच्या बाजूतील मुक्त पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन प्रकल्पाच्या तसेच नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणीसाठा आणि विसर्गामुळे पुरस्थिती उद्भवू नये व सुरक्षिततेच्यादृष्टीने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 7 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 37 हजार 321 क्युसेक्स  व  प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 11 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 41 हजार 961 क्युसेक्स  इतका विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो.
 तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वनवासी विद्यालयात 100 विद्यार्थ्यांनी तयार केली गणपतीची प्रतिकृती

Next Post

महिलेचा मृत्यू आजारामुळे, दरडीखाली सापडल्याने नाही जिल्हा प्रशासनाची माहिती

Next Post
चांदसैली घाटात दरड कोसळल्याने  उपचाराअभावी पत्नीने  पतीची खांद्यावर घेतला अखेरचा श्वास

महिलेचा मृत्यू आजारामुळे, दरडीखाली सापडल्याने नाही जिल्हा प्रशासनाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवकाचा मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या एकास पाच वर्ष सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वीस वर्ष कारावासाची शिक्षा

May 24, 2025
रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे : डॉ.हिना गावित यांचे आवाहन

रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे : डॉ.हिना गावित यांचे आवाहन

May 24, 2025
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणांची सज्जता महत्वाची : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणांची सज्जता महत्वाची : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

May 21, 2025
नातवाच्या लग्नात देशसेवेचा आदर्श,भिका पाटील यांनी ध्वजदिन निधीस दिली 31 हजार रूपयांची देणगी

नातवाच्या लग्नात देशसेवेचा आदर्श,भिका पाटील यांनी ध्वजदिन निधीस दिली 31 हजार रूपयांची देणगी

May 21, 2025
नंदुरबार शहरात तीन लाखाचे बनावट एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे जप्त

नंदुरबार शहरात तीन लाखाचे बनावट एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे जप्त

May 21, 2025
लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

May 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group