Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा तहसिलदार यांना निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
November 4, 2022
in राजकीय
0
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा तहसिलदार यांना निवेदन
नंदूरबार l प्रतिनिधी
 साखर कारखान्यांनी व गुऱ्हाळ मालकांनी उचल व अतिम बिल रक्कम जाहीर करावा याबातचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले.
      या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी व गुऱ्हाळ मालकांनी दि.१६ नोव्हेंबर पर्यत उचल व अतिम बिल रक्कम जाहीर करावा. तसेच ऊसाला पहिली उचल २५०० रुपये व अंतिम बिल ३१०० रुपये त्वरित जाहीर करावे. ऊसाला प्रतिटन ५ हजार पाच रुपये देण्यात यावा. तर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यात यावेत, तोडणी आणि वाहतूक खर्चामधील गैरप्रकार थांबवण्यात यावा, एकरकमी बिले देण्यात यावेत.
 सरकारने जाहीर केलेली एफ.आर.पी.फसवी आहे. गेली दहा वर्षे आम्ही प्रतिटन २ हजार ४०० रुपये घेत आहेत. आता डिझेल, पेट्रोल, खत, मजुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सरकारने यातील दोन हजार रुपये आणि एफ.आर.पी.३ हजार ५०० रुपये असे एकूण पाच हजार ५०० रुपये प्रतिटन दर द्यावा. अन्यथा आम्ही कारखाने सुरु होऊ देणार नाही. तसेच तहसिलदार व जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, साखरमंत्र्यांशी आमची चर्चा घडवून आणावी. तसेच वजनकाटे तपासले जावेत. वाहतूक आणि तोडणी खर्चा कसा आकारला आहे यासंदर्भात समिती नेमून चौकशी केली जावी. एफ.आर.पी.हा केंद्र शासनाच्या अखत्यारितला विषय आहे. याबाबत राज्य शासनाशी चर्चा करण्यासाठी शेतकरी व संघटनेची बैठक घडवून आणावी.
      जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी विविध ठिकाणी आंदोलने होणार असल्याने शेतकरी वर्ग आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर येऊन ऊसाची वाहतूक रोखणे, टोळ्या बंद करणे, रस्ता रोको आंदोलन करणे अशा प्रकारे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे व साखर कारखानदाराचे व सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. साखर सम्राटांनी योग्य भूमिका घ्यावी अन्यथा दि.२२ नोव्हेंबर पासून आंदोलन तीव्र करून कारखानदारांना सळो की पळो करून सोडू. तळोदा तालुक्यातील एकही कारखाना चालू राहणार नाही असा इशारा दिला. शेतकर्‍यांचा कोणी वाली राहिला नाही त्यामुळे सदरील कालावधीत शेतकरी संघटनेचे व एकलव्य आदिवासी युवा संघटनेची चर्चा घडवून आणावी अन्यथा दि. २८ नोव्हेंबर २०२२ पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
    त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड.गणपत पाडवी, सचिव फतेसिंग दादा, सुनील दादा, शंकर वळवी, टेडग्या वळवी, अरुण वसावे, रोहित वळवी, सुनिल वळवी, किरण नाईक, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षक गेले सुटीत गावी, चोरट्यांनी मारला घरात डल्ला, रोकडसह सोन्या चांदीचा ऐवज लंपास

Next Post

शहादा दोंडाईचा रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन

Next Post
शहादा दोंडाईचा रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन

शहादा दोंडाईचा रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group