Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीताफळाच्या खरेदीसाठी झालेली तीन राज्यातील व्यापारी दाखल

team by team
November 3, 2022
in कृषी
0
सीताफळाच्या खरेदीसाठी झालेली तीन राज्यातील व्यापारी दाखल
अक्कलकुवा l प्रतिनिधी
      सातपुडयाचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सीताफळाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून सीताफळाच्या विक्रीतून अति दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र सीताफळावर प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान व उद्योग या भागात विकसित झाले ले तर त्यातून स्थानिक आदिवासी बांधवांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध होत, त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासन आणि प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता आहे.
सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये हजारो सीताफळांची झाडे आहेत दरवर्षी या झाडां पासुन मोठया प्रमाणावर सीताफळे उपलब्ध होतात.साधारणपणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सीताफळाचा हंगाम असतो.या हंगामात दुर्गम भागातील आदिवासी बांधव सीताफळ विक्रीसाठी धडगाव,मोलगी व अक्कलकुवा शहरात मोठ्या संख्येने दाखल होत असतात.सातपुड्यातील नागरिक कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सीताफळांच्या झाडांचे नैसर्गिकरित्या संगोपन करतात तसेच या झाडांना आलेले सीताफळ देखील नैसर्गिकरित्या पिकविली जातात. परिणामी येथील सीताफळे चवीला अधिक गोड व स्वादिष्ट लागतात.
त्यामुळे येथील सीताफळांना महाराष्ट्रा सह गुजरात, व मध्य प्रदेश मध्ये मोठी मागणी असते.या ठिकाणांचे व्यापारी गावोगावी जाऊन सीताफळांची खरेदी करीत असतात तर काही शेतकरी हे आपली सीताफळे थेट बाजारात विक्रीसाठी आणत असतात.यावर्षी देखील सातपुड्याचा रानमेवा अक्कलकुवा,धडगाव,मोलगी, तळोदा आदी बाजारपेठेत दाखल झाला आहे.त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांसोबत सीताफळांच्या खरेदीसाठी नागरिक देखील मोठी गर्दी करीत आहेत.
सीताफळाची प्रत खराब होऊ नये यासाठी आदिवासी बांधव सीताफळे टोपलीमध्ये घेऊन येत असून पूर्ण टोपलीनुसार त्यांची विक्री करीत आहेत. मोठ्या टोपलीला साधारण पणे अडीचशे ते तीनशे रुपये तर लहान टोपलीतील सीताफळांना दीडशे ते दोनशे रुपयांना ग्राहक खरेदी करीत आहेत. यानुसार साधारणतः एका किलोला तीस ते पस्तीस रुपये भाव पडत आहे.
           सातपुड्याच्या रानमेवा खरेदीसाठी नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर या सीताफळांची खरेदी करीत आहेत. आणि येथून खरेदी केलेली सीताफळे मोठ्या शहरात अधिक दराने विक्री करीत आहेत
          सीताफळा वर आधारित उद्योगाची गरज
          सीताफळ हे पिकल्यानंतर लगेच एक ते दोन दिवसांत खराब होणारे फळ आहे त्यामुळे त्याला व्यापारी किंवा शेतकऱ्यांना जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे सीताफळावर आवश्यक ती प्रक्रिया करुन  त्यापासून विविध पदार्थ तयार करुन ते बाजारात विकले तर स्थानिक ग्रामस्थांना अधिक पैसा कमविण्याची संधी मिळेल व जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. मात्र त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाने ठोस पावले उचलुन योग्य कार्यवाही व पाठपुरावा करणे गरजेचे आहे.सातपुड्याच्या कुशीत आमसुल व सीताफळ यांचे मुबलक प्रमाण पाहता नागरिकांना त्यापासुन निर्मित होणाऱ्या प्रक्रिया आधारित उद्योगांची नितांत आवश्यकता आहे.मात्र त्यासाठी लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होतेय
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकाला लाच प्रकरणी एक वर्ष कैदेची शिक्षा

Next Post

भरधाव मालवाहू आयशर ट्रक नदीपात्रात कोसळला

Next Post
भरधाव मालवाहू आयशर ट्रक नदीपात्रात कोसळला

भरधाव मालवाहू आयशर ट्रक नदीपात्रात कोसळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add