Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शने केले खंडीत

Mahesh Patil by Mahesh Patil
August 30, 2021
in राज्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील २२ ग्रामपंचतींना  नोटिसा बजावूनही वीज बिल न भरल्याने या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याचे कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. संबंधित गावांमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे  तेथील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंचायत समितीने दखल घ्यावयाची मागणी ग्रामीण भागातील जनतेने केली आहे.
तळोदा तालुक्यातील तळवे, शिर्वे, झिरी, लोभानी, बुधावली, गव्हाणीपाडा, बेलीपाडा, रापापुर, रेव्हानगर, सरदारनगर, पाठडी, भाबलपुर, सिंगपूर, बोरवण, धनपूर, लाखपूर, बंधारा, सावरपाडा, मालदा, गोंदाळे  व अलवान अश्या २२    ग्रामपंचायतींच्या वीजपुरवठा शनिवारी  कट करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींना वीज वितरण कंपनीने नोटिसा बजावल्या होत्या तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने वीजबिल भरण्याबाबत अनास्था दाखवल्याने नाईलाजास्तव कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कनेक्शन कट केले आहे. या ग्रामपंचयतींकडे अडीच लाखा पासून ते पाच लाखा पर्यंत वीजबिल थकले आहे. कंपनी ने त्यांना चालू बिल भरण्याची सूचना दिली होती. मात्र ते ही न भरल्यामुळे अखेर अधिकार्‍यांना कटू कारवाई हाती घ्यावी लागली याबाबत विजवीतरण कंपनी च्या कार्यालयाने पंचायत समितीलाही लेखी माहिती दिली आहे. मात्र त्यांनीही ठोस कार्यवाही केली नाही.
इकडे थकीत विजबिला पोटी ग्रामपंचायत मधील ग्रामीण खेड्यांच्या पाणी पुरवठ्याच्या वीज पुरवठा खंडित केल्याने तेथे पाणी पुरवठाच ठप्प झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी गावाजवळील आजूबाजूच्या शेतात जाऊन पाणी आणावे लागत आहे. एकीकडे राज्यशासनाने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना थकलेल्या वीज बिलापोटी पंधराव्या वित्त आयोगातून खर्च करण्याची परवानगी दिली आहे. असे असतांना ग्रामपंचायत प्रशासन वीजबिल का रोखून धरत आहे असा सवाल गावकर्‍यांनी उपस्थित करून अश्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची चौकशी करून नाहक ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरणेकामी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. शिवाय थकीत वीजबिल भरून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आज घंटानाद आंदोलन

Next Post

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराचे  माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

January 28, 2023
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

January 28, 2023
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

January 28, 2023
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

January 28, 2023
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

January 28, 2023
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

January 28, 2023

एकूण वाचक

  • 2,686,621 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group