नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील उमटी जामलीसह लगत असणाऱ्या गावातील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून मका ,ज्वारी , भुईमूग इतर पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागात सध्या पाण्याचे स्त्रोत कमी झाले असून, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत. मका ज्वारी खाण्यासाठी आलेली रानडुकरे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
रान डुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रानडुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लपत्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण गावातील शेतात लोकांनी राखण करण्याचे उपाय केले आहेत. रात्री ढाण्या वाजवतात, फटाके फोडण्यात येते. या आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात. थायमेट घालण्यात येते. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते.
संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेत नुकसानग्रस्त रमेश बाज्या तडवी,अशोक मुंगल्या तडवी, कांतीलाल दाज्या तडवी, दाजला फुलजी तडवी, खाअल्या आरशी तडवी, पाण्या हांद्या तडवी, कांतीलाल हांद्या तडवी, साज्या मोत्या तडवी, मोत्या मोयला तडवी, वाण्या दाज्या तडवी, सामा मोत्या तडवी, जात्र्या पोपटा तडवी, सिला बोगा तडवी, भीमा सांगल्या तडवी, साकरा उगराण्या तडवी, मोगना पोपटा तडवी, सिंगा रामा तडवी, काल्या रामा तडवी, गुलबा आरसी तडवी, रमेश आरसी तडवी, खिमजी आरशी तडवी, धर्मा कर्मा तडवी, पारता दाज्या तडवी सह अन्य शेतकरी करीत आहेत.