शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार कल्याण मंडळ गट जळगांव- कामगार कल्याण केंद्र शहादाच्या वतीने आयोजीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-हर घर तिरंगा ‘ चित्रकला स्पर्धेत वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देश्याने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे’औचित्य साधत ‘हर घर तिरंगा’ ह्या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांमधुन पाच विद्यार्थ्यांनी यश संपादित करत बक्षिसाला पात्र ठरले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभात सर्व प्रथम कामगार कल्याण मंडळ गट- जळगांव, कामगार कल्याण केंद्र शहादा चे केंद्र संचालक अभिजीत पेंढारकर यांच्या हस्ते सीमा पाटील, मुख्याध्यापिका यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तर केंद्र सेवक रविंद्र गुमाणे यांनी परीक्षक रत्ना पाटील यांचा सत्कार केला.
चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या कामगार बंधुचे मुल आणि मुलींना म्हणजेच विद्यालयातील विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ दोन अशा एकूण पाच विद्यार्थ्यांना अनुक्रमे वैष्णवी दिलीप पवार ( प्रथम ), निधी भरत पटेल ( द्वितीय ), मेहुल विलास पाटील ( तृतीय ),मोहिनी कैलास पावरा (उत्तेजनार्थ क्र.1),भूमिका दिनेश बच्छाव(उत्तेजनार्थ क्र.2 ) यांना मुख्याध्यापिका, परीक्षक, केंद्र संचालक आणि केंद्र सेवक यांच्या शुभहस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुकेश राजपुत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील चित्रकला विषयाचे शिक्षकवृंद, सांस्कृतिक विभाग आदींनी परिश्रम घेतले.








