नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात माजी मुख्यमंत्री,कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांचे हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती गणेश पराडके, समाज कल्याण समिती सभापती रतन पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कृषि विकास अधिकारी पी.एस.लाटे,कृषि विज्ञान केंद्र कोळदाचे विस्तार विद्यावेत्ता श्रीधर देसले, कार्यक्रम समन्वय राजेंद्र दहातोंडे, उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनातर्फे कै.वसंतराव नाईक,शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील शेतकरी पुंजू चिंधा भोये व नवापूर तालुक्यातील करंजी बु. येथील शेतकरी सुरेश अर्जुन गावीत यांचा जिल्हा परिषद अध्यक्षा अॅङ सीमा वळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच तालुक्यातील बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कृषि स्वावलंबन योजना या योजनांतर्गत निवड झालेल्या नंदुरबार तालुक्यातील बापु निंबाजी पवार, सुशिला काळुसिंग ठाकरे,बापु पुंडलिक वाघ,सोनी दगा जाधव,भामट्याबाई विनोद पाडवी,काशीबाई तुकाराम पवार,अहिलूबाई राजाराम पवार, पुतळाबाई रामभाऊ गवळे,
मंगलबाई जंतीलाल पवार,अतुबाई गोपीचंद पवार, सुमनबाई रतन पवार,ताईबाई वामन सुर्यवंशी,सुनिताबाई गवरलाल पवार,शांतीबाई हिरालाल पवार,भारजीबाई चिंतामण गांगुर्डे,ताईबाई राजू साबळे,मांगीलाल परबत सुर्यवंशी,यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अॅड.सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच श्रीधर देसले यांनी सेंद्रीय शेती व शेतीमध्ये जैविक घटकांचा वापर करून उत्पादकता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.दहातोंडे यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रदीप लाटे, यांनी केले.
सुत्रसंचालन पंचायत समितीचे कृषि अधिकारी एन.बी.सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कृषि अधिकारी विघयो एल.डी.भोये, कृषि अधिकारी,एन.डी.पाडवी,एम.जी.विसपुते, वाय.एस.हिवराळे, टि.एस.पाटील, यांनी सहकार्य केले.