नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी मुदत वाढवून देवून ३१ जुलै २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.
लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
तरी जिल्यानितील पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.