तळोदा l प्रतिनिधी
दि 11 मे रोजी तळोदा तालुक्यातील मोदलपाडा, शेवलाई,राणापुर, काकलपुर, उमरकुवा,सतोना या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
यामुळे या परिसरात घराचे पडझडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .त्या ठिकाणी आ. राजेश पाडवी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी तळोदा तहसीलदार ,मंडळ अधिकारी, तलाठी या सर्व अधिकाऱ्यांना नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
गेल्या दोन वर्षांपासून एकही घरपडीचे नुकसान भरपाई आज पर्यत शासनाकडून आले नाही म्हणून आ.राजेश पाडवी जिल्हाधिकारी यांना याबाबत लवकरच निवेदन सादर करणार आहेत.
तसेच दोन वर्षांपासून नुकसान भरपाई मिळाली नाही व या वर्षाची नुकसानभरपाई गोरगरीबांना मिळनार नसेल तर आ. राजेश पाडवी हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन घरपडीचे नुकसानीची भरपाई शासन देणार नसेल तर स्थानिक आमदार निधितुन नुकसानभरपाई देण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणार आहेत.
या वेळी आ. राजेश पाडवी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी ,प्रविण वळवी ,सुरेश वळवी व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.