नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील दंगल पुर्वनियोजीत असुन रात्रीच्या समयी झोपेत असलेल्या निरपराध नागरीकांवर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर, गांवगुंडावर पोलीसांनी कठोर कार्यवाही करुन ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे त्या नागरीकांना दंगलखोरांकडुन वसुली करुन भरपाई दयावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्याकडे केली आहे.
भारतीय जनता पार्टी तर्फे प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या एका घटनेचा अक्कलकुवा येथील शांतताप्रिय नागरीकांचा कवडीचा संबंध नसतांना त्या निरपराध नागरीकांवर सुनियोजित पध्दतीने कट करुन तलवार, लाठया, काठया, सळया व चॉपरने जो हल्ला केला तो निंदनीय असुन दंगलखोरांना पोलीसांनी वेळीच आवरल नसत तर कित्येक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.
असते ईतकी भिषण परीस्थिती उदभवली, अनेक नागरीकांच्या वाहनांची, घरांची, दुकानांची तोडफोड करुन लुटमार करण्याचे पाप या दंगलखोरांनी केल्यामुळे अक्कलकुवा सह जिल्हयात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी या दंगलखोरांचा कसुन शोध घेऊन या मागे असलेल्या परकीय शक्तींना शोधुन काढावे.
दंगलग्रस्त नागरीकांना नुकसान भरपायी दयावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी त्वरेने दखल घेतली नसती तर अनेक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले असते. दंगलखोरांना राज्य शासनाचे भय राहिले नाही, त्यांची हिम्मत वाढली. असे देखील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नमुद केले आहे.
जिल्हयाती नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बलशाली भारत होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हयात शांतता ठेवावी व पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहान भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.