नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील करजकुपे येथे वीज मीटर बंद असतांना बील कसे आले असा वाद घालत वरिष्ठ तंत्रज्ञास हाताबुक्यांनी मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील नेहरु नगरमधील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीते वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश चैत्राम कोळी हे तालुक्यातील करजकुपे गावात वीज बिलाची वसूली करीत होते.
यावेळी ईश्वर चौधरी रा.करजकुपे ता.नंदुरबार यांनी गणेश कोळी यांना जुने वीज मीटर कायमस्वरुपी बंद असून वीज बील कसे आले या कारणावरुन वाद घातला.
तसेच गणेश कोळी यांना शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली व पोलिसात तक्रार दिली तर गावात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याबाबत गणेश कोळी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात ईश्वर चौधरी याच्याविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत.