Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन वर्षानंतर आज होणार प्राणी गणना,चार ठिकाणी उभारण्यात आली मचान

Mahesh Patil by Mahesh Patil
May 16, 2022
in राज्य
0
दोन वर्षानंतर आज होणार प्राणी गणना,चार ठिकाणी उभारण्यात आली मचान

नंदूरबार l प्रतिनिधी
बुध्द पौर्णिमेला होणाऱ्या प्राणी गणनेच्या पार्श्वभूमीवर तळोदा वन विभागाने सुसज्ज तयारी केली असून यासाठी वाल्हेरी, बन,तुळाजा व अलवान अशा चार ठिकाणी मचान उभारण्यात आले आहेत.शिवाय १३ कर्मचारी देखील तेथे तैनात करण्यात आले आहे. कोरोना मुळे तब्बल दोन वर्षे प्रण्यानांची गणना करणे बंद होते.या दोन वर्षांच्या खंडा नंतर यंदा वन विभागाकडून गणना करण्यात येणार आहे.साहजिकच वन्य प्रेमींना उत्सुकता लागली आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण राज्यात वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांची नेमकी किती संख्या आहे.हे जाणून घेण्यासाठी प्राणी गणना केली जात असते.कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आकाशात प्रचंड उजेड पडतो.त्याचा या शुभ्र प्रकाशात प्राण्यांचा पायाचे ठसे जमिनीवर स्पष्ठ उमटतात.साहजिकच प्राणी,पक्षी यांची गणना अचूक करता येते.वरिष्ठ कार्यालयाचा आदेशा नुसार तळोदा वन विभागाने देखील आपल्या कार्यक्षेत्रातील वाल्हेरी,बन, तूळाजा, अल्वान या वनक्षेत्रातील प्राण्याची गणना करण्यासाठी सुसज्ज अशी तयारी केली आहे.यासाठी या चारही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मचान देखील उभारण्यात आले आहेत.त्याचबरोबर १० वनरक्षक,३ वणपाल असे १३ करमचारी तैनात करण्यात आले आहेत.ही गणना १६ तारखेच्या मध्यरात्री पासून तर १७ च्या सकाळ पर्यंत करण्यात येणार आहे. मेवासी वन विभागाचे उप वनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी प्राणी गणना व पक्षांची नोंद कशी करावी याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. दोन वर्षाच्या खंडा नंतर प्रथमच या प्राणी,पक्षांची मोजणी होणार असल्याने वन्य जीव प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान तळोदा वन क्षेत्रात बिबट,अस्वल, तरस,कोल्हे,रान पिंगळा,मोर अशा प्रजातीचे प्राणी,पक्षी आहेत.आता पर्यंत त्यांचा अधिवास देखील दिसून आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथील जैन आराधना भवनात त्रिदिवसीय संस्कार शिबीराची सूरुवात

Next Post

आदिवासी समाजाने जल,जंगल, जमीन जपने आवश्यक : ॲड.पद्माकर वळवी

Next Post
आदिवासी समाजाने जल,जंगल, जमीन जपने आवश्यक : ॲड.पद्माकर वळवी

आदिवासी समाजाने जल,जंगल, जमीन जपने आवश्यक : ॲड.पद्माकर वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025
बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

October 20, 2025
अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

October 20, 2025
‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group