नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी क्षेत्रातील भागाच्या विकासासाठी मोठ्या 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करून नवीन 45 ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली असून पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नंदुरबार हा सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेला जिल्हा असून राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश नंदुरबार जिल्ह्यात आहे मोठ्या क्षेत्रफळाच्या ग्रुप ग्रामपंचायतीमुळे विकास कामांना गती मिळत नसल्याने पालकमंत्री के सी पाडवी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अश्या 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नविन 45 ग्रामपंचायती स्थापन करणेबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने जुन -2020 ते मार्च -2021 या कालावधी ठराव करुन विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडे 14 सप्टेंबर 2021 रोजी प्रस्ताव पाठविण्यात आले तदनंतरराज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार मा.विभागीय आयुक्त, नाशिक यांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी शासनास प्रस्ताव सादर केला या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना पालकमंत्री पाडवी यांनी जबाबदारी दिली.तदनंतर ग्राम विकास विभागात कक्ष अधिकारी श्रीमती. जेपे यांच्याकडे श्री.रौंदळ यांनी वेळोवेळी समक्ष भेटून तसेच दुरध्वनीव्दारे संपर्कात राहून ग्राम पंचायत विभाजनाचे प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला.
सदर प्रस्ताव मान्यतेपुर्वी निवडणुक आयोगाकडून संमती मिळणेकामी त्या कार्यालयातील अव्वर सचीव श्री.सावंत यांची समक्ष भेट घेवून संमती प्राप्त करून घेतली.
सदर प्रस्ताव राज्य मंत्री, ग्राम विकास यांचे कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी रत्नाकर पगार यांच्याशी संपर्कात राहुन कार्यवाही केली. तदनंतर सदर प्रस्ताव मंत्री, ग्राम विकास यांचे कार्यालयात गेल्यानंतर तेथील विशेष कार्य अधिकारी श्री. बेडसे यांचेशी संपर्कात राहुन कार्यवाही केली. तसेच रोषमाळ खु. व उमरागव्हाण ग्राम पंचायतींचे विभाजनाचे प्रस्ताव अंतिम टप्यात असुन पुढील 15 दिवसात मान्यतेचे आदेश प्राप्त होतील.अशी माहिती त्यांनी दिली माननीय पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने नंदुरबार जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतींचे विभाजन करून नवीन 45 ग्रामपंचायती निर्मिती झाली असून यात सर्वाधिक ग्रामपंचायती धडगाव तालुक्यातील आहे. मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्याने समाधान व्यक्त केले जात असून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य यांनी केलेल्या मागणीचा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी स्वतः लक्ष घालत आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठ पुराव्याचे यश आसल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी दिली आहे .
नंदुरबार जिल्हयातील विभाजन होणाऱ्या ग्रामपंचायती
धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायती
1. मांडवी बु. 2. भुषा 3. राजबर्डी 4. तोरणमाळ 5. रोषमाळ 6. गेंदा 7. चिंचकाठी 8. बिजरी 9. चिखली 10. कात्री
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत
1. उमरागव्हाण
नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायत
1. करंजवेल
2. पाटी बेडकी
नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत
1. राकसवाडे
शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत
1. कलमाडी त.बो.