खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर (बुद्रुक ) शिवारातील शेतात काल दि. 9 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासरू ला ठार करून फस्त केल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच रात्री वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सतर्क केल्याची माहिती आहे सदर बिबट्या हा परिसरात धुमाकूळ घालत असून वनविभागाने त्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दि.9 मे रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाण्याविहीर (बुद्रुक) शिवारातील कोमा सिंगा वळवी यांच्या शेतात गाय व तिचे वासरू बांधलेले असताना अचानक पणे गायीच्या वासरूवर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच ग्रामस्थांनी या बिबट्याला पिटाळून लावले या घटनेचे माहिती वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली त्यांनीही रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आपले पशु धान शेतातून आपल्या घरी सुरक्षित ठिकाणी आणले मृतावस्थेतील वासरूला त्याठिकाणी राहू देण्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने त्याला रात्री तिथेच सोडून देण्यात आले रात्री पुन्हा बिबट्याने त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरावर घेऊन जात त्या वासरूला फस्त केल्याचे सकाळी निदर्शनास आले सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी उद्याच्या पंचनामा केला बिबट्याच्या या परिसरातील संचारा मुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरित या बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वाण्याविहीर (बुद्रुक), टिमकमऊली, विरपुर रामपूर, या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्यांच्या फडशा बिबट्याने पाडल्याची खात्रीलायक माहिती असून या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीतीचे वातावरण आहे याबाबत वनविभागातील अधिकारी, कर्मचार्यांना माहिती नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत सुदर बिबट्या हा आकाराने मोठा असून या परिसरात अनेकांनी या बिबट्याला पाहिल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.
या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर रात्री साडे दहा वाजेला वनकर्मचारी काळे, जाधव ,कोकणी, गावित ,वनमजूर वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत वन्य प्राण्यांविषयी जनजागृती केली या परिसरातील शेतकऱ्यांना आपले पशुधन घेवून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन केले.
वाण्याविहीर गावासह परिसरातील अनेक गावांच्या शेत- शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून हा बिबट्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचवत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांमधील व ग्रामस्थांनी मधील भीती दूर करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.