Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

10 दिवसात दोन वेळा बंद पाडलेले देहली प्रकल्पाचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात झाले सुरु

Mahesh Patil by Mahesh Patil
May 6, 2022
in राज्य
0
10 दिवसात दोन वेळा बंद पाडलेले देहली प्रकल्पाचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात झाले सुरु

अक्कलकुवा l प्रतिनिधी
गेल्या 10 दिवसात दोन वेळा बंद पाडलेले देहली प्रकल्पाचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले.
गेल्या 40 वर्षापासुन रखडत असलेल्या देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटत नसल्याने जानेवारी महिन्यात सुरु झालेले घळ भरणीचे अंतिम टप्प्यातील काम हे गेल्या 10 दिवसात प्रकल्प ग्रस्तांनी दोन वेळा बंद पाडले होते.

दि.26 एप्रिल व दि 4 मे रोजी प्रकल्प ग्रस्तांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद पाडले.दि.26 रोजी काम बंद पाडल्यामुळे त्या अनुषंगाने अधिक्षक अभियंता,उपअभियंता व शाखा अभियंता यांनी तात्काळ आंबाबारी पुनर्वसन येथे जाऊन प्रकल्पग्रस्त व लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या सोबत गावठाणात बैठक घेतली. बैठकी दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरु करु देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला होता. व ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनाही काम न करणेबाबत ताकीद दिली होती.त्या अनुषंगाने पालकमंत्री ना.के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही होत असल्याबाबत प्रकल्पग्रस्तांना अवगत केले होते व घराच्या घसारा पोटी सानुग्रह अनुदान तातडीने देण्याची कार्यवाही केली.दि.3 रोजी 692 प्रकल्पग्रस्तांना सुमारे 2 कोटी 5 लाख रुपयांचे धनादेश द्वारे वाटप ही सुरु करण्यात आले व झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री ना.ॲड.के.सी.पाडवी यांनी भ्रमनध्वनी द्वारे प्रकल्पग्रस्तां सोबत संवाद साधुन काम सुरु करण्याची विनंती केली होती त्या नुसार काल दि.4 रोजी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करण्याचे ठरले.व सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होताच प्रकल्पग्रस्तांच्या 25 ते 30 लोकांनी प्रकल्प स्थळी येऊन पुन्हा काम बंद पाडले त्यामुळे आज दि.5 रोजी प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष,तहसीलदार सचिन मस्के, पोलीस उपअधिक्षक संभाजी सावंत, देहली प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर,पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांनी प्रकल्प स्थळी येथे येऊन जुन्या गावठाणात प्रकल्पग्रस्तां सोबत बैठक घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांवर शासन व प्रशासनाकडुन युध्द पातळीवर कार्यवाही सुरु असल्याचा विश्वास दिला तसेच तळोदा प्रकल्प कार्यालयात स्वाभिमान योजनेत शेती विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही होत असल्या बाबत प्रकल्पग्रस्तांना अवगत करुन स्वाभिमान योजनेअंतर्गत शेती उपलब्ध करुन देण्याचे पत्र दिले.स्वाभिमान योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या शेत जमिनीचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सोबत पुढील आठवड्यात बैठक निश्चित करण्यात आली आहे.तसेच ,102 शेतकऱ्यां व्यतिरिक्त ज्या भुमीहीनांचे स्वाभिमान योजनेसाठी नावे सुटलीत त्यांची नावे समाविष्ट करावी करण्यात येतील असे आश्वासन दिले.त्यामुळे आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित यांच्या सह मोठ्या पोलीस बंदोबस्तात देहली प्रकल्पाच्या कामाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला.

देहली प्रकल्पाच्या प्रकल्प बधितांना स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत तालुक्यात शेत जमीन देणे आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना स्वाभिमान योजनेत आपली शेत जमीन विक्री करावयाची असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील तलाठी किंवा प्रकल्प अधिकारी तळोदा, तसेच तहसिल कार्यालय अक्कलकुवा येथे संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबारातील जगतापवाडी चौफुली ते गिरीकुंज सोसायटीपर्यंत नालीचे काम तात्काळ करा, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप यांचा आंदोलनाचा इशारा

Next Post

दहा लाखाचा धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने ठोठावली एकाला सहा महिन्यांची शिक्षा; १ लाख २० हजाराचा दंड

Next Post
नंदुरबार शहरात दिवसाढवळया  घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास

दहा लाखाचा धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने ठोठावली एकाला सहा महिन्यांची शिक्षा; १ लाख २० हजाराचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group