Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे

Mahesh Patil by Mahesh Patil
May 4, 2022
in राजकीय
0
जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे

नंदुरबार l प्रतिनिधी
जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात पुन्हा एकदा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले.जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी मनमानी करत जलजीवन मिशनसाठी अटी-शर्ती लागू केल्याने जलजीवनची कामे रेंगाळली असल्याचा आरोप सदस्यांनी केला. शासन निर्णय नसतांना अटी लागू केल्या कशा? असा सवाल उपस्थित करत जि.प.सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.


सर्वसाधारण सभेदरम्यान जि.प.सदस्या हेमलता शितोळे यांनी जलजीवन मिशनसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अटी-शर्ती लागू केल्याने जलजीवन मिशनची कामे रेंगाळली असल्याचे सांगत अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी केली. यावर जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांना याबाबत यापूर्वी दोनदा विचारणा केली असता त्यांनी तसा शासन निर्णय असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने अभियंता बाविस्कर दोनदा खोटे बोलल्याचा आरोप ॲड.रघुवंशी यांनी केला. यावर जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी अनुभवाची अट कायम करुन कामे देण्याच्या सूचना दिल्या. यावर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आजपासून ३० वर्षानंतरचे अर्थात २०५३ पर्यंतचा विचार करुन कामे करावयाची असल्याने तशा अटी लागू केल्याचे सांगितले. मात्र यावर सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सदरच्या अटी शिथिल करण्याचा ठराव करण्याचे सांगत मनमानी करीत अटी लागू करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, कंत्राटी कर्मचारी भरतीत स्थानिकांना डावलण्याचा आरोपही जि.प.सदस्यांकडून करण्यात आला. तिनसमाळ येथील पाणी पुरवठा योजनेंतर्गत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली असून डेब्रामाळ पाणी पुरवठा योजना प्रकरणी ठेकेदार व अभियंत्याचा खुलासा घेवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सीईओ रघुनाथ गावडे यांनी दिली. धडगाव तालुक्यातील भुजगाव धरण सन २००१ मध्ये वाहून गेले होते. यावेळी धरणाच्या कामासाठी ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र ते काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यानंतर कामाची किंमत वाढत आज १ कोटी ३५ लाखांपयंर्त पोहचली असूनही धरणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर जि.प.सदस्य विजय पराडके यांनी ताशेरे ओढले. नवापूर तालुक्यातील पाड्यांवरील टंचाई दूर करण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावित यांनी केली. घरकुलांचे फोटो अपलोड करतांना संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैशांची सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जि.प.सदस्य दीपक नाईक यांनी केली. तसेच अक्कलकुवा येथील गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यभार काढण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.सदस्य विजय पराडके यांनी दिला. सदरची सभा जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, निर्मला राऊत, गणेश पराडके, अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर व विसरवाडी येथे मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त

Next Post

वीर कुलभूषण श्री.परशुराम जयंती साजरी

Next Post
वीर कुलभूषण श्री.परशुराम जयंती साजरी

वीर कुलभूषण श्री.परशुराम जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group