नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नेहरू चौकात असलेल्या दलाई लामा फाउंडेशन संचलित शिवभोजन केंद्रावर अक्षय तृतीयाचे औचित्य साधून लाभार्थ्यांना आमरस पुरणपोळीचा मेनू देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते आमरस पुरणपोळीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ॲड.राम रघुवंशी म्हणाले की, शासनाच्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरजूंना नियमित भोजन देण्यात येते. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती प्रमाणे यंदा अक्षय तृतीया निमित्त नेहरू चौकातील शिवभोजन केंद्रातर्फे लाभार्थ्यांना पुरणपोळीचा अस्वाद घेण्याची संधी मिळाली. यावेळी दलाई लामा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत अमृतसागर, सचिन चौधरी, विजय माळी, जितेंद्र गुरव, नरेंद्र चौधरी, यश चौधरी, कृष्णा चौधरी उपस्थित होते.