तळोदा l प्रतिनिधी
समाजातील गीते मौखिक कृतीने एका पिढीतून दुसरीकडे कडे जात असतात . मात्र त्याला कायम स्वरुपी लिखित स्वरूपात जपण्यासाठी लिखित स्वरूपातील जपून ठेवलेला हा ठेवा निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श लिखाण ठरणार आहे यामुळे आपली संस्कृती टिकणार आहे महाराष्ट्रात अहिराणी समृद्ध भाषा असून या लिखाणातून त्या भाषेची देखील साहित्य म्हणून जपवणूक झालेली दिसून येते यात भाषाशास्त्राच्या अतिशय सुंदर प्रयोग दिसून येत असून प्रत्येक समाजामध्ये गल्लोगल्लीत तो दिसून येतो वेगवेगळी भाषा आपल्या परिसरात बोलली जाते मराठीतून शिकून अहिराणी साहित्य तयार करणे येणाऱ्या पिढीसाठी लिखाणासाठी प्रेरणा मिळणार आहे असे प्रमुख अतिथी म्हणून आलेले प्रा.जे एन.शिंदे यांनी पुस्तक प्रकाशन वेळी बोलतांना मत व्यक्त केले.
अहिराणी गाण्याचां व पुस्तक प्रकाशन सोहळा तळोदा येथील संत सावता माळी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी लेखिका प्रा. ललिता मगरे यांनी पुस्तक लेखांनाचा अनुभव कथन व्यक्त केल्या. ओव्या व दुवा यातील फरक सांगितला . लग्नाचा वेळी व दुःखाचा वेळी अहिराणी मधील म्हंटले जाणारे गीतांना शब्दबद्ध करण्याचा उद्देश सफल झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जे.एन शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी. भारती अरविंद टवाळे भाजपचे योगेश चोधरी, चेतन पवार तसेच माळी समाज महिला मंडळच्या अध्यक्षा भारती टवाळे, नगरसेवक गोरव वाणी, प्राचार्य.शशिकांत मगरे. दतात्राय सूर्यवंशी, हेमलाल मगरे, निमेश सूर्यवंशी, अजित टवाळे, निलेश सूर्यवंशी. अभियंता जगननाथ लोखंडे, रतीलाल सागर,
डॉ.सूर्यकांत पंजराळे, डॉ अमर राजकुळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मगरे यांनी केले .
सूत्र संचलन प्रा.मीनल राणे व हेमंत सूर्यवंशी. यांनी केले. या सोहळ्याचे आयोजन पोपट हुलाजी मगरे व प्रा.ललिता पोपट मगरे यांनी केले होते.
पुस्तकातील सार. –
विधी प्रमाणे लग्नाची गाणी, दळणचा जात्या वरील आहिरणी गाणी व अहिराणी दुवा.








