Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्ट पासून होणार सुरु

Mahesh Patil by Mahesh Patil
July 31, 2021
in शैक्षणिक
0
नंदुरबार| प्रतिनिधी
मिशन बिगीन अगेन अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेल ेशाळांचे वर्ग फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आताआदिवासी विकास विभागाच्या दि२६ जुलै २०२१ रोजीच्या शासननिर्णयानुसारआश्रमशाळातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सोमवार दि.२ ऑगस्ट २०२१ पासून शाळा सुरु करण्यात येतआहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्यावर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणे संदर्भात आदिवासी विकासमंत्री ऍड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागातील शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यात येत आहेत.
प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी व सुरुझाल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुरक्षितते बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याप्रमाणे, आश्रमशाळा या निवासी असल्याने पाल्याला शाळेत व वसतिगृहात पाठवणे पूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आणि संशयित किंवा कोविड बाधित आढळल्यास योग्यती दक्षता घेणे याबाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षिक-अधीक्षिका आणि गृहपालयांची आहे. त्याचप्रमाणे अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक परिस्थिती नुसार व जिल्हाप्रशासनाच्या कोविड-१९च्या अनुषंगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.
शाळा सुरु करताना ज्या ग्रामीण भागात किमान एक महिना आधी कोविड रुग्ण आढळलेला नाही अशा ग्रामपंचायत आणि तेथील पालकांशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरु करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. या शाळा सुरु करण्या पूर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतला असणे आवश्यक आहे.  यासोबतच संपूर्ण आश्रमशाळा व वसतिगृहाचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात येवून त्या ठीकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने विविध समित्या गठीत करण्यात याव्यात. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था व निवास व्यवस्था यांच ेयोग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे या बाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावण्यात  याव्यात असे ही प्रसिद्धी पत्रकामार्फत सूचित केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील व्यापार्‍याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणार्‍या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

Next Post

नंदुरबारचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी युरोपातील खंडातील सर्वोच्च शिखर केले सर, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद, सलग तिसऱ्यांदा विश्वविक्रम करून साधली हॅट्ट्रिक

Next Post
नंदुरबारचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी युरोपातील खंडातील सर्वोच्च शिखर केले सर, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद, सलग तिसऱ्यांदा विश्वविक्रम करून साधली हॅट्ट्रिक

नंदुरबारचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी युरोपातील खंडातील सर्वोच्च शिखर केले सर, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद, सलग तिसऱ्यांदा विश्वविक्रम करून साधली हॅट्ट्रिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

March 26, 2023
नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

March 26, 2023
शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

March 26, 2023
माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

March 26, 2023
गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

March 26, 2023
नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

March 26, 2023

एकूण वाचक

  • 2,964,603 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group