Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रावलापानी येथे ब्रिटिशांच्या गोळीबारात शहीद झालेल्या आदिवासी शहिदांना श्रद्धांजली वाहून हजारोंनी नागरिकांनी जागविल्या त्यांच्या स्मृती

team by team
March 2, 2022
in राष्ट्रीय
0
रावलापानी येथे ब्रिटिशांच्या गोळीबारात शहीद झालेल्या आदिवासी शहिदांना श्रद्धांजली वाहून हजारोंनी नागरिकांनी जागविल्या त्यांच्या स्मृती

तळोदा l प्रतिनिधी
ब्रिटिशांच्या गोळीबारात तालुक्यातील रावलापानी येथे शहीद झालेल्या आदिवासी शहिदांना श्रद्धांजली वाहून हजारो आदिवासी बांधवांनी त्यांचा स्मृती जागविल्या.त्यासाठी या बांधवांनी न्युबन पासून तब्बल पाच किलोमीटर सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यं पार केल्या होत्या.


भारतीय स्वातंत्र्यासाठी तालुक्यातील रावलापाणी येथे २ मार्च १९४३ ला संत रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधवांनी तीव्र लढा पुकारला होता.आदिवासींच्या या स्वातंत्र्याचा लढ्यास चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी गोळीबार केला होता.त्यांचा गोळीबारात बहुसंख्य आंदोलक शहीद झाले होते.आदिवासी शहिदांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा हा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मोरवड येथील आप समाजा तर्फे २ मार्च रोजी तेथे श्रध्दाजली वाहण्याचां कार्यक्रम आयोजित केला जातो.बुधवारी देखील हा कार्यक्रम रावलापानी येथील स्मारकस्थली श्रध्दांजलीचां कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.साहजिकच जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी हजेरी लावत शहिदांच्या स्मृती जागवल्या.त्यासाठी हे आदिवासी बांधवाणी न्यूबन पासून तब्बल पाच किलो मिटर सातपुड्यातील दऱ्याखोऱ्या तुडवल्या होत्या.या श्रध्दांजली कार्यक्रमात डॉ.कांतीलाल टाटीया,माजी सभापती जितेंद्र पाडवी,हिरामण पाडवी, किसन महाराज यांनी उपस्थितांना या शहिदांच्या इतिहास सांगितला.यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे,माजी सरपंच नारायण ठाकरे, प्रेमराज पाडवी,परेश पाडवी,अशोक पाटील आदींसह महिला,पुरुष, जिल्ह्यातील संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान सदर शहीद स्मारकाचे काम निधी अभावी गेल्या दोन वर्षंपासून रखडले आहे.त्यासाठी जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.परंतु अजूनही दाद मिळत नसल्याने शासनाच्या अशा उदासीन धोरणाबाबत उपस्थित आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

स्मारकाच्या रखडलेल्या कामा बाबत उपस्थितांनी केली तीव्र नाराजी.शहीद झालेल्या या विरांच स्मारक रावळापानी येथे उभारण्यात येत आहे.तथापि हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.आता पर्यंत केवळ ४० लाख रुपये देण्यात आले आहे.तेवढ्याच रकमेचे काम झाले आहे.उर्वरीत निधीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.परंतु उदासीन प्रशासन अजूनही दाद देत नाही.वास्तविक गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्वतः कार्यक्रमास हजेरी लावून हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची ताकीद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती.त्यांनीही काम अटोपण्याची हमी दिली होती.मात्र त्यानंतर निधीच उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे हे काम तसेच पडून आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी उरला केवळ एक महिना

Next Post

नंदुरबार व धुळे जिल्हा तुन राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात ११९ गाईड सहभागी

Next Post
नंदुरबार व धुळे जिल्हा तुन राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात ११९ गाईड सहभागी

नंदुरबार व धुळे जिल्हा तुन राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात ११९ गाईड सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add