Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देशाचे इंधन आयातीवरील हजारो कोटी रुपये वाचविण्यासाठी ३०० बांबू रिफायनरी सुरू करा : पाशा पटेल

team by team
March 1, 2022
in राजकीय
0
देशाचे इंधन आयातीवरील हजारो कोटी रुपये वाचविण्यासाठी ३०० बांबू रिफायनरी सुरू करा : पाशा पटेल

नंदुरबार l प्रतिनिधी
देशाचे इंधन आयातीवरील हजारो कोटी रुपये वाचविण्यासाठी ३०० बांबू रिफायनरी सुरू कराव्यात,शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करावी.भविष्यातील इथेनॉलची वाढती गरज बांबू लागवडीतून पूर्ण होणार असल्याने आज बांबू लागवड काळाची गरज असल्याचे कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.दरम्यान,वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशातून कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढत्या धोक्यामुळे मानवी जिवित धोक्यात असल्याचा इशाराही पटेल यांनी दिला आहे.
नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते.यावेळी खा.डॉ.हीना गावित उपस्थित होत्या. यापुढे श्री.पटेल म्हणाले,पेट्रोल आयातीवर देशाला ८ हजार ५० कोटीहून अधिक रक्कम खर्च करावी लागते.इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापरण्याचे प्रमाण वाढल्यास या खर्चात बचत होवू शकते.आणखी काही वर्षात देशाला एक हजार कोटी लिटरहून अधिक इथेनॉल लागणार आहे.इथेनॉलची हि गरज भागविण्यासाठी १७ लाख ६० हजार एकरवर बांबू लागवड करावी लागणार आहे.बांबू रिफायनरीतून इथेनॉलची वाढती गरज भागू शकणार आहे.यातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळू शकेल.यासाठी ३०० बांबू रिफायनरी सुरू कराव्यात अशी मागणी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून केली असल्याचे पटेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषणात देखील घट मोठी वाढ झाली आहे.इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यास प्रदूषणदेखील कमी होवू शकते.इथेनॉलची सध्याची गरज लक्षात घेता भविष्यात लाखो लिटर इथेनॉल लागणार असल्याने त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे.यामुळे बांबू रिफायनरी सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याबाबत श्री.पटेल यांनी सांगितले की, बांबू हे पीक कमी खर्चात येते.या पिकासाठी फार खर्च लागत नाही.बांबू रिफायनरी सुरू झाल्यास बांबू उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.शेतकरी बांबूच्या उत्पादनाकडे वळल्यास त्यांना पारंपारिक पिकाच्या तुलनेत समाधानकारक फायदा होवू शकतो.एकरी शेतकऱ्याला किमान दोन लाख रुपये यातून मिळणार असल्याचा दावा पटेल यांनी केला.

बातमी शेअर करा
Previous Post

भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक, एक जण ठार तर बालकासह तिघे जखमी

Next Post

बॉक्सिंग पंच परिक्षेत २५ परीक्षार्थींना सहभाग

Next Post
बॉक्सिंग पंच परिक्षेत २५ परीक्षार्थींना सहभाग

बॉक्सिंग पंच परिक्षेत २५ परीक्षार्थींना सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add