तळोदा l प्रतिनिधी
मोलगी परिसरातील भगदरीचा मोजापाडा येथील ग्रामस्थांनी रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी बनविले २५ नियम आणि हे नियम गावांतील लोकांना बंधनकारक करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कमी होणारी नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हे लक्षात घेऊन भगदरीचा मोजपाडा गांव एकत्र आले आहे.


मोजापाडा येथील नागरीकांनी तयार केलेल्या ग्रामसमृद्धीच्या नियमा बरोबरच लोकांनी गावांतील आरोग्य, शिक्षण,रोजगार व जल जंगल जमीन आणि पाणी,या ग्राम विकासातील पायाभूत सुविधांचा आधार असलेल्या गोष्टीसाठी लोकांनी एकत्र येऊन गावासाठी २५ नियम तयार करुन या ठाम राहण्याची संकल्प केला आहे.
आपल्या गावांतील लोकांना एकत्र करून या संघटनशक्तीचा वापर आपण आपल्या ग्रामसमृद्धीसाठी करावा अशी संकल्पना गावांतील सामाजिक कार्यकर्ते रायसिंग वसावे आणि ॲड. फुलसिंग वळवी यांनी मांडल्याने गावांतील लोकांनाही ही संकल्पना आवडल्याने या संकल्पनेला खूबच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.दर महिन्याला गावांतील सर्व लोकांनी एकत्र जमून गावातील अडचणी व येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या अशा गोष्टींवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीत गावातील रोजगारा विषयी चर्चा करण्यात आली व गावातील लोकांच्या हाताला काम नसल्याने गावांतील १०० लोकांचे काम मागणी अर्ज भरण्यात आले असून लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जात केली आहे.
बैठकीस गावांतील रायसिंग वसावे, ॲड. फुलसिंग वळवी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.या बैठकीत अनिल वळवी,रुपसिंग वसावे,रायसिंग पाडवी,डॉ.वसंत पाडवी,गोवलीबाई वसावे,दुर्गाबाई पाडवी,सोमाबाई वसावे,यांच्यासह गावांतील नागरिक उपस्थित होते.त्याच प्रमाणे मोलगी परीसर सेवा समितीचे मनोहर पाडवी,आपसिंग वसावे,यांनीही रोजगार व ग्रामसमृद्धी विषयी मार्गदर्शन केले.त्यांच्या बरोबर रिड्सचे आशिष बारी आणि रवी तडवी उपस्थित होते.









