नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 27 दिवसानंतर नवापूर आगारातून सुरत साठी 19 प्रवाशांना घेऊन बस रवाना झाली होती.दरम्यान बस वाहक काल खूप दबावात आल्याने एका शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळला त्यांना विसरवाडी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,27 दिवसानंतर नवापूर आगारातून सुरत साठी 19 प्रवाशांना घेऊन बस रवाना झाली होती.या बसचे वाहक इयोब गावित वाहिक (क्र.41995) ( वय ५० ) बस घेऊन जाताना प्रचंत तणावात होता. दरम्यान ड्युटी बजावून घरी न जाता अन्य ठिकाणी रात्र भर होते, त्यांच्या घरच्यांनी त्यांचं शोध घेतला असता ते एका शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडले त्यांना विसरवाडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.








