नंदुरबार l महेश पाटील
नंदुरबार शहरातील वळण रस्त्याची दुरुस्ती तसेच अवजड वाहतूक आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसंदर्भात प्रशासनाने सहा जुलै पर्यंत योग्य भूमिका घ्यावी.अन्यथा रस्त्यावरच्या लढाईचा खासदार ॲड.गोवाल पाडवी यांचा प्रशासनाला इशारा दिला आहे.
या बाबत ॲड.गोवाल पाडवी यांनी सांगितले की, या संदर्भात परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून तोंडी सूचना केल्या. मात्र संबंधित विभागांकडून योग्य ते उपाययोजना केल्या जात नसल्याने निरापराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तसेच अवजड वाहतूक करणारे वाहन, बेभान वेगाने जाणारी वाहने यांच्यावर येत्या सहा जुलै पर्यंत कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. रस्त्याची दुरुस्ती आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिवसा वाहतुकीवर बंदी घालण्यासंदर्भात सहा जुलैपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास जनतेच्या न्यायालयात जाऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या इशारा नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांनी प्रशासनाला दिला आहे.