नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षात देशात नरेंद्र मोदी यांनी काय केले हे सांगण्याची त्यांच्या हिम्मत नाही त्यांनी ही हिम्मत इंदिरा गांधी यांच्याकडून घ्यावी काँग्रेसच्या काळात निर्माण झालेले विविध प्रकल्प खाजगी उद्योगांना विकण्याचे काम मोदी करीत आहेत असा आरोप भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला. नंदुरबार येथील सभेत त्या बोलत होत्या.
नंदुरबार येथे महा आघाडीचे उमेदवार ॲड.गोवा पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी भाजपा व मोदीवर कडाडून टीका केली. त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या दहा वर्षात देशात मोदी मोदी सरकारने नवीन काही केलेले नाही जे आहे ते काँग्रेसच्याच काळातले आहे व त्याचेही प्रकल्प अरबपती,उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. नरेंद्र मोदींमध्ये हिम्मत नसून हिम्मत त्यांनी इंदिरा गांधी जवळून घ्यावी असे सांगत. महाराष्ट्रात जनाधार नसतानाही आमदार पैशांवर विकत घेऊन सत्ता स्थापन करतात काँग्रेस अशा पद्धतीचे पाप कधी करणार नाही. असे सांगत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाच्या समाचार घेतला त्या मनाला की मोदी सांगतात की आम्ही शबरीचे पुजारी आहोत. शबरीची पुजारी असते तर देशातील हजारो शबरींचा अपमान, अत्याचार होत आहे. असे असतांना नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत असा सवाल प्रियंका गांधी केला.
यावेळीकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ.के.सी.पाडवी, माजी मंत्री नसीम खान , आ.शिरीष नाईक, माजी खा.बापू चौरे, यांच्यासह शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी, प्रतिभा शिंदे, गणेश पराडके, आ.उदेसिंग पाडवी, जयपालसिंह रावल, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
* दरम्यान सभा संपल्यानंतर प्रियंका गांधी या व्यासपीठावर उतरून नागरिकांमध्ये गेल्या तसेच कार्यकर्त्यांच्या मोबाईल घेत त्यांनी सेल्फीही घेतली*
*आजचा सभेला मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते
* प्रियंका गांधी या व्यासपीठावर 11. 38 मिनिटांनी आल्या त्यांनी 42 मिनिट भाषण केले.
*प्रियंका गांधी यांचे भावनिक आवाहन मात्र विकासावर चर्चा नाही