Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनगर आरक्षणाची याचिक सूप्रिम कोर्टाने फेटाळली

Mahesh Patil by Mahesh Patil
April 20, 2024
in राजकीय
0
धनगर आरक्षणाची याचिक सूप्रिम कोर्टाने फेटाळली

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती बांधकाम व आरोग्य तसेच आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव सुहास नाईक यांनी धनगर समाजाने अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळावे यासाठीच्या दाखल याचिकेला आवहान देणारी याचिका मा. हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर मा.हायकोर्टाने एतिहासिक निर्णय देत धनगरांची याचिका फेटाळली होती. त्या निकालानंतर सुहास नाईक यांनी या निर्णयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात Caveat दाखल केली होती. या निर्णयाच्या विरोधात धनगरांनी सर्वोच्च न्यायालयात आवहान देणारी याचिका दाखल केली होती परंतू आज मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली.
धनगर आरक्षणाच्या याचिकेने जितके आदिवासींचे नुकसान झाले, तितकीच धनगर समाजाची देखील त्यांच्याच लोकांनी प्रचंड फसवणूक व दिशाभूल केली. कोर्टाने निकाल देऊन या फसवणुकीला आळा बसला ही एक चांगली गोष्ट घडलेली आहे.

 

 

 

 

आदिवासी आणि धनगर समाज यांच्यात सांस्कृतिकदृष्ट्या कोणतेही साम्य नाही हे अनेक अहवाल व निर्णयातून सिद्ध झालेले आहे. असे असतानाही निव्वळ नामसाधर्म्य व आपल्या राजकीय दबावतंत्राचा गैरवापर करत आपले काल्पनिक तर्क लावून धांगड व धनगर हे एकच असल्याचे भासवत होते.

 

 

 

महाराष्ट्र सरकार देखील या दाव्याला एकप्रकारे छुपे समर्थन देत होते. परंतु आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी व इतर संघटनांच्या वतीने प्रचंड संघर्ष करत आदिवासींची बाजू मुंबई उच्च न्यायालयात सक्षमपणे मांडली व सत्य स्वीकारायला व त्यावर शिक्कामोर्तब करायला लावले.

 

 

 

 

मुंबई उच्चन्यायालयात लढाई सुरू असताना धनगर समाजाचे काही तथाकथित नेते चुकीचे पुरावे समाजासमोर ठेऊन एकूणच समाजाची दिशाभूल करत होते. त्यामुळे आदिवासी समाज बांधव देखील काहीसे धास्तावले जात होते. यातून रस्त्यावर उतरून आंदोलने देखील करावे लागली होती. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर धनगर व आदिवासी हे वेगळेच असल्याचे सिद्ध झाले. आज सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने शेवटी सत्याचा म्हणजेच आदिवासींचा विजय झाला असे म्हणावे लागेल. हा निकाल जरी आदिवासींच्या बाजूने लागलेला असला, तरी येणाऱ्या काळात विविध आव्हानांना तोंड देताना हाच लढाई बाणा सर्व आदिवासी बांधवांनी जोपासणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ. हिना गावित यांच्याकडून आता कॉर्नर सभांचा धडाका; कॉर्नर सभेतून काँग्रेसवर केले प्रहार

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेमध्ये बंडखोरी की उमेदवार बदलणार ?

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेमध्ये बंडखोरी की उमेदवार बदलणार ?

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेमध्ये बंडखोरी की उमेदवार बदलणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

December 29, 2025
द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

December 29, 2025
बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

December 27, 2025
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

December 27, 2025
नंदुरबार येथील एस. ए. चर्च येथे नाताळनिमित्त सामूहिक प्रार्थना

नंदुरबार येथील एस. ए. चर्च येथे नाताळनिमित्त सामूहिक प्रार्थना

December 26, 2025
अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,23 लाखाची दारू पकडली.दोघांना अटक

अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,23 लाखाची दारू पकडली.दोघांना अटक

December 26, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group