नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील गोगापूर येथे पाच एकर ऊसाला आग लागल्याने ऊस संपूर्ण जळून खाक झाला आहे.
अमृत ईशी यांच्या शेताला अचानक आग लागली असल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे. गोगापूरच्या कुरंगी शिवारातील १२/१, २ हेक्टर १० आर एवढं क्षेत्रावर ऊस लागवड केला होता, सात लाखापेक्षा अधिकच यात नुकसान झाले असल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागले असल्याचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या ऊस पूर्णतः जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठ्या संकट येऊन ठेपलं आहे त्यामुळे शासनाने तात्काळ अमृत ईशी या शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








