नंदुरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे दि . ३ ते ५ नोव्हेंबर रोजी खानदेश विभागीय कृषी महोत्सवाचे नंदुरबारला आयोजन करण्यात येत आहे .या कृषी महोसत्वाचे उदघाटन आज गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता जी टी पी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. सलग ३ दिवस कृषी महोत्सवानिमित विविध कार्यक्रम चर्चासत्र प्रदर्शन व आरोग्य शिबिर होणार आहे .
दि ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहरातील मोठा मारुती मंदीरापासून कृषी दिंडीला सुरुवात होईल. सकाळी साडे १० वाजता जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानात प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल , कार्यक्रमाला नितीन मोरे, चंद्रकांत मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे . पहिल्या दिवशी उद्घाटनानंतरअण्णासाहेब मोरे हे सेवेकऱ्यांशी हितगुज साधणार आहेत.दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विषमुक्त शेती यावर चर्चासत्र व त्यानंतर सर्व जातीय धर्मियांसाठी वधूवर परिचय मेळावा होईल .
दि .4 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पशू गोवंश या विषयातील तज्ञांचे चर्चासत्र होणार असून दुपारी १२ वाजता आरोग्य शिबिर कुपोषणमुक्त गाव या विषयावर चर्चासत्र होईल . दि . ५ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी पर्यावरण तज्ञ व सायबर क्राईम या विषयावर चर्चासत्र होईल दुपारी एक वाजता युवक , युवती व शेतकरी व्यावसायीकांकरीता उद्योग व्यवसाय मेळावा असून त्याच दिवशी कृषी महोत्सवाचा समारोप होईल.
या महोत्सवात प्रदर्शन तज्ञांचे चर्चासत्र , खानदेश कृषी अणि पशू गौवंश प्रदर्शन , वनऔषधी रानभाज्या व देशी बियाण्यांचे प्रदर्शन , मोफत आरोग्य शिबिर आणि कुपोषणमुक्त गाव कार्यक्रम होणार आहे . खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला सेवेकरी , शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र व कृषी संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.








