नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालीकेवर विरोधी भाजपाकडुन होत असलेल्या दोनशे करोडच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांबाबत न्यायालयाने विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांची याचीका फेटाळली आहे. कुठलाही पुरावे नसतांना बिनबुडाचे आरोप करणाऱया विरोधाकांनी या साऱया प्रकरणात थेट ईडीकडुन (अंमलबजावणी संचलनालय) चौकशीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात या बाबत कुठलेही पुरावे सादर करु न शकल्याने ही याचीका फेटाळली आहे. यामुळे दुध का दुध आणि पाणी पाणी झाले असल्याच्या प्रतिक्रीया शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
नंदुरबार नगरपरिषदेमध्ये विविध विकास कामांमद्ये सन 2005 ते 2020 या कार्यकाळात जवळपास दोनशे कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप सातत्याने विरोधी भाजपाकडुन केल्या जात होता. यावरुन अनेक वेळा सभा प्रतिसभामधुन रणकंदन देखील पहावयास मिळाले होते. याच अनुशंगाने नंदुरबार नगरपरिषदेमधील भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी थेट उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपिठात रिट याचीका दाखल केली होती. या याचिके मध्ये चारुदत्त कळवणकर यांनी संबंधीत कार्यकाळात नंदुरबार नगरपालीके दोनशे कोटींपेक्षा जास्तचा भ्रष्ट्राचार झाल्याचा दावा केला होता.
यातील प्रतिवादी भारत सरकार यांना या भ्रष्ट्राचाराच्या अनुशंगाने थेट ईडीमार्फत (अंमलबजावणी संचलनालय) या साऱया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कळवणकर यांनी केली होती. या साऱया याचिकेबाबत मेहरमान न्यायलायाने विचार करत भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांची याचीका फेटाळुन लावली आहे. न्यायालाने याचिकाकर्त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचे निष्कर्ष नोंदवला आहे तसेच याचीका करतांना कलम 156 (3) चा आधार देखील घेतला नसल्याचे नोंदवले आहे
याचिकाकर्ते श्री.कळवणकर यांच्याकडे फक्त लेखापरिक्षण अहवाल असुन मुळातच या साऱ्या बाबत यापुर्वीच प्रधानसचिवांनी 10 जुलै 2015 रोजी चौकशी अहवाल सादर केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या व्यतिरीक्त कुठलेही ठोस असे पुरावे सादर करण्यात भाजपाला अपयश आले असुन यामुळे न्यायालयाने या आरोपांबाबत याचिका फेटाळुन लावली आहे.

दुध का दुध आणि पाणी का पाणी
या निकालानंतर शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी हा निर्णय म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी असा करणारा असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. भ्रष्ट्राचार झाला नसतांना जनतेची दिशाभुल करण्यासाठी कांगावा करुन दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांकडुन होत असलेल्या आरोपाबाबत कोणतेही पुरावे नसल्याने न्यायालयान त्यांची फेटाळल्याने हे प्रकरणच बरच काही सांगुन जात असल्याचे त्यांनी सांगितले.








